मुंबई : महाराष्ट्रातील केंद्रात एक नेता कृषीमंत्री असतांना त्यांनी शेतकऱ्यांना काहीच केलं नाही. एमएसपीचे पैसे देण्यात त्यावेळी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत होत्या, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर अप्रत्यक्ष टिका केली आहे. त्यावर आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन कृषीमंत्री असतांना घेतलेल्या निर्णयांची आकडेवारी देत मोदींना प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…२०२४ ला लोकसभा निवडणुकाचा गुलाल उधळणार, निवडणुक आयोगाने उचललं मोठं पाऊल
प्रधानमंत्री हे पद संस्थात्मक आहे, त्याची प्रतिमा राखायला हवी होती. परंतु या पदाची प्रतिमा राखून त्यांनी जी माहिती दिली आहे. त्याबद्दल बोलणार आहे. २००४ ते २०१४ कृषीमंत्री असतांना देशाला २००४ साली अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती. त्याच्या पहिल्याच दिवशी कटू निर्णय मला घ्यावा लागला. त्यावेळई २ दिवसात त्या फाईलवर सही करून अमेरिकेकडून गृ आयात करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा…भुजबळांना धक्का देणारी बातमी, महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली
अमेरिकेकडून गव्हू आयात करतानाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोन केला होता. त्यावेळी मी अस्वस्थ झालो होतो. त्यानंतर ३ ते ४ आठवड्यानंतर शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी पावलं उचलली पाहिजेत. त्याचा पहिला निर्णय केला. हमी भाव वाढवण्यासाठी प्रयत्न केले. गव्हू कापूस सोयाबीन याच्या हमीभावात वाढ केली. उसाची किंमंत ७०० होती ती २१०० केली होती. प्रत्येक पीकासाठी प्रयत्न केले. युपीए सत्तेत असताना काही योजना सुरू केल्या. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन त्यावेळी सुरू केले. याच्या माध्यमातून भाजीपाला उत्पादन वाढवलं. राष्ट्रीय कृषी योजना २००७ यामुळे कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला गेला. अन्न धान्याबाबत काही ठराविक राज्याचा उल्लेख होतो. यामध्ये बिहार आसाम सारख्या राज्यांत भात उत्पादन होतं परंतु ते कमी होतं म्हणून त्याच्या वाढीसाठी प्रयत्न केले असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं.
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्यांनी शरद पवारांचा हात धरला, पक्ष प्रवेशाने अजित पवार गटातही वाढली धाकधुक
दरम्यान, मत्सपालन वाढीसाठी राष्ट्रीय मत्सपालन बोर्डाची स्थापना केली. ज्या योजना राबवल्या त्यामुळे देश अन्नधान्याच्याबाबत स्वयंपूर्ण झाला. एकेकाळी आयात करणारा देश निर्यातदार झाला. १० वर्षात ७.७ अब्ज डॉलरवरून ४२.८४ अब्ज डॉलरची निर्यात करण्यात आली शेतकऱ्याच्या आत्महत्या होतं होत्या. त्या रोखण्यासाठी ६२ हजार कोटी रूपयांचं कर्जमाफ करण्यात आलं. पीक कर्जाचा रेट १८ टक्के होता. तो ४ टक्क्यांवर आला. काही जिल्ह्यात ० टक्के व्याज आकरण्यात येत असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं.
AD ALSO :
हेही वाचा…“अजित पवारांना दु: ख झालं का ? ते समाजापेक्षा मोठे नाहीत”, जरांगे पाटलांनी अजित पवारांना फटकारलं
हेही वाचा…बालेकिल्ल्यात अजित पवारांची नाचक्की, मराठा समाजाने दिला मोठा दणका
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद धोक्यात, शिंदेंना मोदी- शाहांकडून संदेश,” बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…“पुन्हा येण्याच्या मोहापायी गप्प बसून महाराष्ट्राच्या हिताशी किती तडजोड कराल?” फडणवीसांना डिवचलं
हेही वाचा…अजित पवारांना बारामतीतच प्रवेशबंदी, आजचा कार्यक्रम होणार रद्द ? पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात