सोलापूर : राज्यात मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाने आजपासून राज्यभर साखळी उपोषण सुरू केले आहे. तर ठिकठिकाणी मराठा समाजाकडून राज्यातील राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना विरोध केला जात आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माळेगाव साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमाला जाणार होते. मात्र मराठा समाजाने सकाळीपासून कारखान्याच्या परिसरात ठाण मांडल्याने अजित पवारांनी कार्यक्रमाला जाणं टाळलं आहे. यातच अजित पवारांच्या गाड्यांचा ताफा आता परत पुण्याकडे फिरल्या आहेत. यावरून आता मनोज जरांगे पाटलांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…भुजबळांना धक्का देणारी बातमी, महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली
अजित पवार काही समाजापेक्षा मोठे नाहीत. समाज मोठा आहे आणि अजित पवारांना दु: ख झालं का ? त्यांनी कार्यक्रम रद्द केला तर काय झालं? मराठा पोरं जीव देत आहेत. समाजाच्या काळजावर जखमा झाल्या आहेत. अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे. माळेगाव साखर कारखान्यात अजित पवारांनी जाणं टाळलं त्यावर जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्यांनी शरद पवारांचा हात धरला, पक्ष प्रवेशाने अजित पवार गटातही वाढली धाकधुक
दरम्यान, आमरण उपोषणाला मोठ्या संख्येने मराठा समाज बसणार आहे आणि हे देशातील मोठे आंदोलन असणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन ३१ ऑक्टोंबरला ठरणार असून उपोषणामुळे पोटात त्रास होत आहे. परंतु माझ्या समाजाच्या पोरांनाही त्रास होत आहे. आज सहा वाजेपर्यंत सरकारकडून उत्तराची वाट पाहीन. माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन सरकारने प्रामाणिकपणा दाखवावा. मला अजूनही सरकारच्या वतीने फोन किंवा निरोप आला नाही. असंही मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय.
AD ALSO :
हेही वाचा…बालेकिल्ल्यात अजित पवारांची नाचक्की, मराठा समाजाने दिला मोठा दणका
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद धोक्यात, शिंदेंना मोदी- शाहांकडून संदेश,” बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…“पुन्हा येण्याच्या मोहापायी गप्प बसून महाराष्ट्राच्या हिताशी किती तडजोड कराल?” फडणवीसांना डिवचलं
हेही वाचा…अजित पवारांना बारामतीतच प्रवेशबंदी, आजचा कार्यक्रम होणार रद्द ? पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
हेही वाचा…२०२४ ला लोकसभा निवडणुकाचा गुलाल उधळणार, निवडणुक आयोगाने उचललं मोठं पाऊल