सोलापूर : राज्यात मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाने आजपासून राज्यभर साखळी उपोषण सुरू केले आहे. तर ठिकठिकाणी मराठा समाजाकडून राज्यातील राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना विरोध केला जात आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माळेगाव साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमाला देखील मराठा समाजाकडून विरोध केला आहे. त्यामुळे अजित पवार आजच्या कार्यक्रमाला जाणार की नाही.? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…“मोदींच्या काळात भारतीयांवर १७३ लाख कोटी इतका कर्जाचा बोजा,” सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल
बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यक्रमाचं संचालकांकडून अजित पवारांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चेने विरोध दर्शवत अजित पवारांना कार्यक्रमाला येऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आजच्या कार्यक्रमाला अजित पवार जाणार का? याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. तत्पुर्वी साखर कारखान्याजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अजित पवार कार्यक्रमाला येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“डायमंड उद्योग होतोय साफ, कुठं लपून बसलेत एक फुल दोन हाफ”, पटोलेंची जहरी टिका
दरम्यान, मराठा आरक्षणावरून मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील अनेक गावांत राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमाला मराठा समाजाकडून आडकाठी आणळली जात असून गाड्यांनाही घेराव घातला जात आहे. तर बारामतीत देखील अजित पवारांना येण्यास विरोध केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…२०२४ ला लोकसभा निवडणुकाचा गुलाल उधळणार, निवडणुक आयोगाने उचललं मोठं पाऊल
हेही वाचा…भुजबळांना धक्का देणारी बातमी, महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्यांनी शरद पवारांचा हात धरला, पक्ष प्रवेशाने अजित पवार गटातही वाढली धाकधुक
हेही वाचा…मराठा समाजाचा दणका..! परभणीत तब्बल १५५ उमेदवार रिंगणात, निवडणुक आयोगाने रद्द केली निवडणुक
हेही वाचा…“आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर व ओबीसी समाजाला फसवले,” पटोलेंचा हल्लाबोल