मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच गाजत आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच बारामती मतदार संघात नियोजित कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. यातच आज सांयकाळ पर्यंत सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात काही निरोप आला नाही तर संपुर्ण राज्यात मराठा बांधव उपोषणाला सुरूवात करतील असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. तर अजित पवार गटाचेचे आमदार निलेश लंके यांनी आरक्षण न दिल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडण्याचा इशारा देत सरकारला घरचा आहेर दिला आहे.
हेही वाचा…अजित पवारांना बारामतीतच प्रवेशबंदी, आजचा कार्यक्रम होणार रद्द ? पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
राज्याचं हिवाळी अधिनेशन नागपुर येथे ७ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे. दहा दिवसाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका जाहीर झाली आहे. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना दहा दिवसात अधिवेशन गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी मराठा आरक्षणावरून सरकारला कडक इशारा दिला आहे.
हेही वाचा…२०२४ ला लोकसभा निवडणुकाचा गुलाल उधळणार, निवडणुक आयोगाने उचललं मोठं पाऊल
दरम्यान, कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही. आम्ही आज सत्तेत जरी असलो तरी हिवाळी अधिवेशन बंद पाडण्याची मराठा आमदारांची तयारी आहे. असं निलेश लंके यांनी सांगितलं आहे. तर मराठा समाजासोबत आता मराठा आमदारांनी देखील आरक्षणाबाबत भूमिका घेण्यास सुरूवात केल्याने सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शेतकऱ्यांसाठी काय केलं ? थेट आकडेवारीच जाहीर करत शरद पवारांनी मोदींना दिलं प्रत्युत्तर
हेही वाचा…“अजित पवारांना दु: ख झालं का ? ते समाजापेक्षा मोठे नाहीत”, जरांगे पाटलांनी अजित पवारांना फटकारलं
हेही वाचा…बालेकिल्ल्यात अजित पवारांची नाचक्की, मराठा समाजाने दिला मोठा दणका
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद धोक्यात, शिंदेंना मोदी- शाहांकडून संदेश,” बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…“पुन्हा येण्याच्या मोहापायी गप्प बसून महाराष्ट्राच्या हिताशी किती तडजोड कराल?” फडणवीसांना डिवचलं