मुंबई : मिंधे-भाजप राजवटीतील मुंबई महापालिकेतील रस्ते महाघोटाळा गेल्या वर्षी जनतेसमोर आणून पालिकेतील किमार एक हजार कोटी रूपये वाचवले. अन्यथा हे पैसे खोके कंत्राटदाराच्या घशात घातले असते. या कामांसाठी आगाऊ मोबदला द्यायचा आणि कामाचा खर्च वाढवण्याचा त्यांचा डाव मोडून काढला. असं हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर चढवला आहे.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजपला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली”, फडणवीसांचा तो व्हिडीओ अन् शिंदे गटाने दिलं उत्तर
मिंधे-भाजप राजवटीच्या लाडक्या पाच कंत्राटदारांपैकी एका कंत्राटदाराला पालिकेने काम रद्द करण्याची नोटीस बजावली आहे. त्याची मुदत २६ ऑक्टोबरला संपली. या नोटीशीच्या उत्तरावर, पुढील आठवड्यात पालिका सुनावणी घेणार आहे. आता मुळ प्रश्न असा आहे की, पालिका दबावाला बळी पडून खोके सेटलमेंट स्वीकारेल? की या कंत्राटदाराला काळ्या यादित टाकेल? असा खोचक सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा…“समाजाला आरक्षण न दिल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू”, मराठा आमदारांनी दिला सरकारला कडक इशारा
पाचमधूनच आणखी एका कंत्राटदाराकडे पूर्व उपनगरातील १ हजार कोटींचे काम सोपवण्यात आले आहे. अलिकडे चिपळूणमध्ये पडलेल्या पुलाचे कामही हाच कंत्राटदार करत होता. या प्रकरणाची साधी चौकशी तरी झाली का? काही कारवाई केली का? कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले का? हा कंत्राटदार कुणाचा लाडका आहे? त्याचे मुंबईतील कंत्राट रद्द करण्यात येईल का? असे सवालही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहेत.
हेही वाचा…शेतकऱ्यांसाठी काय केलं ? थेट आकडेवारीच जाहीर करत शरद पवारांनी मोदींना दिलं प्रत्युत्तर
दरम्यान, यावर्षी जानेवारीत पालिकेने ६००० कोटींच्या रस्त्यांच्या कामाचे वाजत गाजत भूमिपूजन केले. पण त्यातील एक रस्ता सोडाच एक किलीमीटरचे कामही पूर्ण झालेले नाही. मुंबईतील रस्त्यांच्या कामांचा कालावधी १ ऑक्टोबरपासून सुरु होऊन ३१ मे ला संपतो. आता २८ ऑक्टोबर उजाडला तरी २१-२२ आणि २२-२३ मध्ये काढलेली एकाही रस्त्याची कामे सुरू झालेली नाहीत. कागदावर साडे आठ हजार कोटींची कामे. प्रत्यक्षात काही नाही. अशा महाराष्ट्राद्रोही खोके सरकारच्या हातून मुंबईची पिळवणूक का? लवकरच आमचे सरकार स्थापन होईल आणि त्यावेळी आम्ही या सर्व घोटाळ्यांची चौकशी करून दोषींना शिक्षा करू. असा इशाराही त्यांनी दिलाय.
मिंधे-भाजप राजवटीतील @mybmc चा रस्ते महा घोटाळा गेल्या वर्षी जनतेसमोर आणून आम्ही पालिकेचे किमान एक हजार कोटी रुपये वाचवले. अन्यथा हे पैसे खोके सरकारने कंत्राटदाराच्या घशात घातले असते.
या कामांसाठी आगाऊ मोबदला द्यायचा आणि कामाचा खर्च वाढवण्याचा त्यांचा डाव आम्ही मोडून काढला.
हा… pic.twitter.com/gMYwsQe5jQ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…सरकार मायबाप तयार रहा…! ‘या’ मागण्यांसाठी लवकरच वंचितचा दणका मोर्चा नागपूरात धडकणार
हेही वाचा…“2024 मध्ये आम्हाला कुणीही रोखू शकणार नाही, “आघाडीच्या ‘या’ नेत्यांनी दिला सुचक इशारा
हेही वाचा…“किती हा वेडेपणा, काहीतरी डोकं ठिकाणावर आहे का”, ‘त्या’ व्हिडीओबाबत फडणवीसांचं स्पष्टीकरण
हेही वाचा…“६ हजार कोटीच्या कामांची घोषणा केली, नारळ फोडला, पण कामे तशीच”, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
हेही वाचा…एकनाथ शिंदेंना मोठा झटका, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची घरवापसी, आज होणार पक्षप्रवेश