पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात गेल्या ३ दिवसांत ६ तरुणांनी आत्महत्या करूनही नेते त्याकडं केवळ मूकपणे पाहणार आहेत का? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला केला आहे. तसेच केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे भाजपची सत्ता असल्याने दोन्ही सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाच्या विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
हेही वाचा…“किती हा वेडेपणा, काहीतरी डोकं ठिकाणावर आहे का”, ‘त्या’ व्हिडीओबाबत फडणवीसांचं स्पष्टीकरण
मी पुन्हा येईन चं स्वप्न पूर्ण करण्याच्या चर्चेत लोकांना फार काळ गुंतवून ठेवता येणार नाही.. नेत्याचं एखादं स्वप्न सामान्य नागरिक जसा पूर्ण करू शकतो तसाच तो स्वप्न उध्वस्तही करू शकतो, हे कुणीही विसरता कामा नये. आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नसतात उलट आपलंच कुटुंब, आई-वडील, मुलं हे उघड्यावर पडतात, त्यामुळं कुणीही आत्महत्या करू नये, असं देखील रोहित पवारांनी आवाहन केलं आहे.
हेही वाचा…“६ हजार कोटीच्या कामांची घोषणा केली, नारळ फोडला, पण कामे तशीच”, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दाच आता राज्यात जोरदारपणे तापत चाललला आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या गाड्या मराठा समाज बांधवांकडून आडवल्या जाताहेत. याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी आपली संघर्ष यात्रा स्थगिती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच माझा मराठा समाजाला पाठिंबा असल्याचंही सांगितलं.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात गेल्या ३ दिवसांत ६ तरुणांनी आत्महत्या करूनही नेते त्याकडं केवळ मूकपणे पाहणार आहेत का?
केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे भाजपची सत्ता असल्याने दोन्ही सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाच्या विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणावी.…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…‘ते’ मोदी सरकारचेच अपयश, शरद पवारांवर टिका केल्यानंतर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न एक दोन दिवसात सुटणार ?” शिंदेंच्या मंत्र्यांनी दिलं शुभ संकेत
हेही वाचा…‘तो’ लाडका कंत्राटदार कुणाचा ? काळ्या यादीत टाकणार का? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
हेही वाचा…सरकार मायबाप तयार रहा…! ‘या’ मागण्यांसाठी लवकरच वंचितचा दणका मोर्चा नागपूरात धडकणार
हेही वाचा…“2024 मध्ये आम्हाला कुणीही रोखू शकणार नाही, “आघाडीच्या ‘या’ नेत्यांनी दिला सुचक इशारा