मुंबई : मराठा आरक्षणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. मनोज जरांगे पाटलांची मागणी सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी केली जात आहे. तर आता संपुर्ण राज्यात मराठा समाजाकडून आंदोलन केले जात आहे. यातच आता राजधानी दिल्लीत देखील मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं जात आहे.
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न एक दोन दिवसात सुटणार ?” शिंदेंच्या मंत्र्यांनी दिलं शुभ संकेत
सकल मराठा समाजाच्या वतीने जंतर-मंतरवर आजपासून उपोषण करण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतही आंदोलन करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांची झाडाझडती घेण्यात आळी. जंतर मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी असतानाही पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप गंगाधर पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा…‘तो’ लाडका कंत्राटदार कुणाचा ? काळ्या यादीत टाकणार का? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलन पेटंल आहे. धाराशिव जिल्ह्यात आंदोलकांनी ६ बसवर दगडफेक करत काचा फोडल्या आहेत. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील बससेवा बंद करण्यात आली आहे. मराठवाडा विभागात आंदोलन पेटलंय. या ८ जिल्हयात धाराशिव येथून जाणाऱ्या बस बंद केल्या आहेत. इतर भागात स्थिती पाहून एखादी बसेस सोडल्या जात आहेत. मात्र धाराशिव आगारातून एकाही फेरी बस सुरू नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल होत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…बंजारा समाजाचा मोठा नेता शरद पवारांच्या गळाला, पक्षाने दिली लगेचच मोठी जबाबदारी
हेही वाचा…“अजित पवारांना शब्द दिला होता अन् तो आम्ही पूर्ण केला,” देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
हेही वाचा…“एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी तेच मुख्यमंत्री राहतील,” फडणवीसांनी सांगितलं राजकीय गणित
हेही वाचा…“तीन दिवसांत ६ मराठा तरूणांनी संपवलं जीवन”, मराठा समाज आक्रमक
हेही वाचा…‘ते’ मोदी सरकारचेच अपयश, शरद पवारांवर टिका केल्यानंतर राष्ट्रवादीचा हल्लाबोल