मुंबई : शिंदे समितीने केलेल्या सर्व्हेमध्ये ११ हजार ५३० कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ कुणबी दाखले देण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना केलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा पडला पहिला राजीनामा, पत्रात मांडल्या तीव्र भावना
एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकारकडून प्रामाणिकपणे काम केलं जात आहे. सरकार कुणालाही फसवणार नाही. मनोज जरांगे पाटलांनी थोडा वेळ द्यावा, त्यांच्या तब्येतेची आम्हाला काळजी असून त्यांनी लवकरात लवकर रूग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.कायद्याच्या चौकटीत राहून टिकणारं आरक्षणाला मराठा समाजाला आम्ही देणार आहोत. शिंदे समितीने दिलेला अहवाल उद्या मंत्रिमंडळात सादर केला जाईल. तो स्विकारल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला जाईल अन् पुढील कारवाई करण्यात येईल.
हेही वाचा…“समाजाच्या मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार का?” सरकारला ठाकरेंचा संतप्त सवाल
दरम्यान, जुन्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीने मोठे कष्ट घेतले आहेत. त्यानुसार कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ दाखले देण्यात येतील. २ महिन्यात शिंदे समिती अखेरचा अहवाल सादर करणार आहे. क्युरेटिव्ह पिटिशनसाठी ३ निवृत्त न्यायमूर्तींची समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून विभागनुसार माहिती गोळा करण्यासाठी समिती काम करेल. आरक्षणासाठी आमचं सरकार प्रमाणिकपणे काम करीत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना आमचं आवाहन आहे की, त्यांनी अजून सरकारला वेळ दिला पाहिजे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या आमदाराच्या घरावर आधी तुफान दगडफेक, मग थेट गाड्याच जाळल्या, मराठा आंदोलक आक्रमक
हेही वाचा…अखेर प्रश्न सुटला..! मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा मोठा निर्णय ?
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराच्या घरावर मराठा आंदोलकांची तुफान दगडफेक, सहा गाड्याही फोडल्या
हेही वाचा…“राजीनामा देऊन तुम्ही उपकार करता का ?” हेमंत पाटील आणि मराठा आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक
हेही वाचा…“मराठा समाजाने षडयंत्र ओळखावे” असीम सरोदे यांनी व्यक्त केली शक्यता