नवी दिल्ली : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत आज कोर्टात पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडेबोल सुनावत अपात्र आमदारांच्या संदर्भात ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे थेट आदेश कोर्टाने दिले आहे. त्यामुळे एका बाजूला मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असतांना एकनाथ शिंदे या प्रकरणात अपात्र होणार का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात केल्या जात आहेत.
हेही वाचा…“मराठा समाजाने षडयंत्र ओळखावे” असीम सरोदे यांनी व्यक्त केली शक्यता
आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेत नसल्याने सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. २० ऑक्टोंबर रोजी सुनावणी झाली पण दोन्ही बाजूने वेळ मागितला. त्यामुळे सुनावणीला विलंब झाल्याचे यावेळी अधिवक्ता तुषार मेहता यांनी म्हटले आहे.
आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत घ्या, असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. सर्वाच्च न्यायालयाने आजवर स्वायत्व संस्थेला मुदत दिली नाही, तर या प्रकरणी ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या. असे आदेश सरन्यायाधिशांनी दिले आहेत.
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा पडला पहिला राजीनामा, पत्रात मांडल्या तीव्र भावना
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात आता अतिशय गंभीर होत चालला आहे. अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून जाळपोळ केली जात असून राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचं घर आणि गाड्या देखील मराठा आंदोलकांकडून पेटवून दिल्या आहेत. यातच कुणबीचा उल्लेख असलेल्या मराठ्यांना उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात येईल अशी घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
हेही वाचा…“समाजाच्या मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार का?” सरकारला ठाकरेंचा संतप्त सवाल
दरम्यान, शिंदे समिती आपला अहवाल मंत्रिमंडळाकडे उद्या सादर करणार आहे. त्यानुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच मनोज जरांगे पाटलांनी आणखी एका महिन्याची मुदत सरकारला देण्यात यावी, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय अद्यापही सुटलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार पण शिंदे अपात्र होणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात केली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भावनिक आवाहन, घेतला ‘हा’ निर्णय
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या आमदाराच्या घरावर आधी तुफान दगडफेक, मग थेट गाड्याच जाळल्या, मराठा आंदोलक आक्रमक
हेही वाचा…अखेर प्रश्न सुटला..! मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा मोठा निर्णय ?
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराच्या घरावर मराठा आंदोलकांची तुफान दगडफेक, सहा गाड्याही फोडल्या
हेही वाचा…“राजीनामा देऊन तुम्ही उपकार करता का ?” हेमंत पाटील आणि मराठा आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक