नागपूर : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिसंक वळण लागले आहे. बीड जिल्ह्यात काल आमदार जयदत्त क्षीरसागर तसेच राष्ट्रवादीचं कार्यालय मराठा आंदोलकांनी जाळून टाकलं आहे. त्यामुळे आज बीडमध्ये संचारबंदीचे आदेश देण्यात आले असून बसव्यवस्था देखील बंद करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सरकारला विशेष अधिवेशन घेण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी काॅंग्रेसच्या ‘या’ आमदाराने दिला राजीनामा, मराठा समाज आक्रमक
मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चाललाय. ३० दिवसांतच हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन सरकारने दिले होते पण ते काही पाळगले गेले नाही. हा विषय सरकारने गांभीर्याने घेतला पाहिजे. काहीतरी ठोस पावले उचलली पाहिजेत. हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ एक दिवसीय अधिवेशन बोलवावे. असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केलीय.
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी भाजपच्या आमदाराने दिला राजीनामा, तर दुसऱ्या बाजूला भाजपच्याच आमदाराचा फोडलं ऑफिस
दरम्यान, मागील एक महिन्यापासून सुरू असलेले आंदोलन आता हिसंक वळणावरती गेले आहे. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून त्यांची प्रकृतीही ढासळत चालली आहे. तर दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलकांकडून ठिकठिकाणी रास्तो रोको करत रस्त्यावरच टायर पेटवलं जात आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलचं चिघळलं आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चाललाय. ३० दिवसांतच हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन सरकारने दिले होते पण ते काही पाळले गेले नाही. हा विषय सरकारने गांभीर्याने घेतला पाहिजे, काहीतरी ठोस पावले उचलली पाहिजेत. हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ एक… pic.twitter.com/dUtJfNXUDs
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 31, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू अंतरवाली सराटीत दाखल, मनोज जरांगे पाटलांशी करणार चर्चा
हेही वाचा…वंचितचं पत्र अंतरवाली सराटी पोहचलं अन् जरांगे पाटलांनी घेतलं पाणी
हेही वाचा…नाशिकमध्ये शिंदे गटाच्या खासदाराने दिला राजीनामा, मराठा आरक्षणासाठी आमदार-खासदारांचे राजीनामे सत्र सुरू
हेही वाचा…बीडमध्ये मराठा समाज आक्रमक, राष्ट्रवादीचं कार्यालय अन आमदारांचं घरही पेटवलं
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंनी फडणवीसांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी,” कुणी केली मागणी ?