मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनोज जरांगे पाटलांशी फोनवरून चर्चा केली. फोनवरून तब्बल २० मिनिटांच्या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाची जरांगे पाटलांना माहिती दिली. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदेसोबत झालेल्या चर्चांबाबत माहिती दिली.
हेही वाचा…नाशिकमध्ये शिंदे गटाच्या खासदाराने दिला राजीनामा, मराठा आरक्षणासाठी आमदार-खासदारांचे राजीनामे सत्र सुरू
महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली या दोन दिवसात विशेष अधिवेशन घेऊन सूरू कराव्यात. कारण आता आम्ही थांबायला तयार नाही. सर्वांनी मुंबईत या असं आवाहन सर्व आमदार, खासदारांना केलं होतं. तिथं आंदोलन करा, गोर-गरिब लेकरांच्या मागे उभे रहा. असंही आवाहन त्यांनी केलं आहे.
हेही वाचा…बीडमध्ये मराठा समाज आक्रमक, राष्ट्रवादीचं कार्यालय अन आमदारांचं घरही पेटवलं
मराठा समाजाचा व्यवसाय शेती असल्याने त्यांना शेतीनुसार कुणबी आरक्षण द्या. यापूर्वी ६० टक्के मराठा समाज हा ओबीसीत गेला आहे. एवढंच नाही तर , ज्यांना कुणबी प्रमाणपत्र नको, त्यांना जबरदस्ती नाही. उद्रेक करू नका. शांततेच आंदोलन करा. असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपचा 2024 मध्ये पराभव नक्की..! त्याचं श्रेय शिंदे अन् अजित पवार या दोन मराठा नेत्यांना जाईल”, कुणी केली टिका ?
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एक दिवसीय अधिवेशन बोलावा,” राष्ट्रवादीची मागणी
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू अंतरवाली सराटीत दाखल, मनोज जरांगे पाटलांशी करणार चर्चा
हेही वाचा…वंचितचं पत्र अंतरवाली सराटी पोहचलं अन् जरांगे पाटलांनी घेतलं पाणी