मुंबई : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेत्यांनी राजीनामे देण्यास सुरूवात केली आहे. यातच शिंदे गटाचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून राजीनामा दिल्यानंतर नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित राजीनामा दिला आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…बीडमध्ये मराठा समाज आक्रमक, राष्ट्रवादीचं कार्यालय अन आमदारांचं घरही पेटवलं
खासदारांना मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देता येतो का ? असा सवाल करत आरक्षणाच्या प्रश्नावरून खरंतर मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे. कारण त्यांच्या राज्यात हिंसाचार होत आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना यासाठी मुख्यमंत्री केलं काय तर म्हणे मराठा चेहरा, आहे. इथे मराठ्यांच्या तोंडाला फेस आला आहे. मराठा मरतोय. मराठा जळतोय. एक मराठा मुख्यमंत्री अपयशी ठरतोय. हा कसला चेहरा आहे. असं म्हणत संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधला.
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंनी फडणवीसांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी,” कुणी केली मागणी ?
पुढे बोलतांना संजय राऊत म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप पुढच्या निवडणुकीत पराभूत होणार आहे. त्याचं श्रेय एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन मराठा नेत्यांना जाईल. असाही हल्लाबोल राऊतांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एक दिवसीय अधिवेशन बोलावा,” राष्ट्रवादीची मागणी
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू अंतरवाली सराटीत दाखल, मनोज जरांगे पाटलांशी करणार चर्चा
हेही वाचा…वंचितचं पत्र अंतरवाली सराटी पोहचलं अन् जरांगे पाटलांनी घेतलं पाणी
हेही वाचा…नाशिकमध्ये शिंदे गटाच्या खासदाराने दिला राजीनामा, मराठा आरक्षणासाठी आमदार-खासदारांचे राजीनामे सत्र सुरू