सांगली : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात आता चांगलाच चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. यातच काॅंग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री विश्वजीत कदम यांना मराठा आंदोलकांनी माघारी पाठवले आहे. त्यामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा…“गद्दारांच्या अपात्रतेची ‘तारीख’ ठरली !” उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
काॅंग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांना मराठा आंदोलकांनी धारेवर धरलं आहे. सांगलीवाडी गावात प्रवेश बंदी असताना आलेल्या आमदार विश्वजीत कदम यांना माघारी पाठवलं आहे. सांगलीवाडीत भारती विद्यापीठामध्ये कामानिमित्त आलेल्या विश्वजीत कदम यांना मराठा आंदोलकांनी कॉलेजमधून परत पाठवल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा…“सर्वात अपयशी आणि नापास गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा”, सुषमा अंधारे यांची मागणी
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अनेक मराठा आमदारांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये भाजपसह शिंदे गट तसेच राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसच्याही आमदार-खासदारांनी राजीनामे दिले आहेत. यातच आता उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची उद्या बैठक बोलवली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण घालवलं,” भाजपचा जोरदार पलटवार
हेही वाचा…बीड जाळपोळीच्या घटनेबाबत मोठी कारवाई होणार, फडणवीसांनी पोलिसांना दिले आदेश
हेही वाचा…“तिथे मणिपूर, जळतंय, इथे महाराष्ट्र पेटतंय., मोदी फक्त भाषण करून जातात”
हेही वाचा…मंत्रिमंडळाची बैठक संपन्न, मराठा समाजासाठी एकनाथ शिंदेंनी घेतले मोठे निर्णय
हेही वाचा…“प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील..,” राज ठाकरेंचं मनोज जरांगे पाटील यांना पत्र