मुंबई : मराठा आरक्षणावर अजूनही काही मार्ग निघतांना दिसत नाही. काल मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत बैठक बोलावली. परंतु या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर होते. एका मुख्यमंत्र्याला डेंग्यू झाला तर दुसरा उपमुख्यमंत्री रायपुरमध्ये पक्षाचं प्रचार करण्यासाठी गेले होते. म्हणजे महाराष्ट्रात रोज आत्महत्या होत आहेत. जाळपोळ होत आहे. अन् उपमुख्यमंत्री पक्षाचा प्रचार करीत आहे. त्यामुळे यांना महाराष्ट्र महत्वाचं नाही हे यावरून स्पष्ट होतंय. अशी जळजळीत टिका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलीय. त्यावर आता भाजपकडून पलटवार केला जात आहे.
हेही वाचा…“सर्वात अपयशी आणि नापास गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा”, सुषमा अंधारे यांची मागणी
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला कायदा करून दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर घालवले. उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाचे आरक्षण घालवले नसते तर आज आंदोलनाची वेळच आली नसती. आता तेच उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना मराठा आरक्षणावरून सवाल करत आहेत. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा असं भाजपकडून सांगण्यात आलंय.
हेही वाचा…“तर राज्यातील सर्व ४८ खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्या”, उद्धव ठाकरेंचं आवाहन
मनोज जरांगे पाटलांनी जी शंका उपस्थित केली आहे. ती रास्त आहे. मराठा आरक्षण चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. जाळपोळ करणारे वेगळेच असून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. जणेकरून महाराष्ट्रात कोणतेही उद्योगधंदे येणार नाहीत. हा एक डाव असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेय.
हेही वाचा…“राजकीय नेत्यांचे Apple फोन हॅक होताहेत,” जितेंद्र आव्हाडांचं ‘ते’ ट्विट चर्चेत
शिवरायांची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मग मधल्या काळात तुम्ही अशा शपथा का घेतल्या नाहीत? तुमच्याकडे मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यास वेळ होता. तरीही यातून तुम्ही मार्ग काढा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. परंतु इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता निर्णय मंत्रिमंडळात घ्या. असंही ठाकरेंनी म्हटलं.
मा. @Dev_Fadnavis जींनी मराठा समाजाला कायदा करून दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर घालवले. @OfficeofUT नी मराठा समाजाचे आरक्षण घालवले नसते तर आज आंदोलनाची वेळच आली नसती. आता तेच उद्धव ठाकरे देवेंद्रजींना मराठा आरक्षणावरुन सवाल करत आहेत.
याला म्हणतात xx च्या…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 31, 2023
READ ALSO :
हेही वाचा…बीड जाळपोळीच्या घटनेबाबत मोठी कारवाई होणार, फडणवीसांनी पोलिसांना दिले आदेश
हेही वाचा…“तिथे मणिपूर, जळतंय, इथे महाराष्ट्र पेटतंय., मोदी फक्त भाषण करून जातात”
हेही वाचा…मंत्रिमंडळाची बैठक संपन्न, मराठा समाजासाठी एकनाथ शिंदेंनी घेतले मोठे निर्णय
हेही वाचा…“प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील..,” राज ठाकरेंचं मनोज जरांगे पाटील यांना पत्र
हेही वाचा…“गद्दारांच्या अपात्रतेची ‘तारीख’ ठरली !” उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल