मुंबई : काही लोकांनी बीडमध्ये लोकप्रतिनिधींचे घर जाळणे, विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट करणे, काही लोकांचे हॉटेल, दवाखाने, प्रतिष्ठाने जाळणे अशा प्रकराची कारवाई केली आहे. ही कारवाई अत्यंत चुकीची असून त्याची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. अशा लोकांवर पोलिस आणि गृहविभाग कडक कारवाई करणार असा इशारा राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हेही वाचा…“तर राज्यातील सर्व ४८ खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्या”, उद्धव ठाकरेंचं आवाहन
बीड जिल्ह्यात मराठा आंदोलकांकडून राष्ट्रवादीचे कार्यालय तसेच आमदार प्रकाश सोळंके, जयदत्त क्षीरसागर यांचे घर जाळून टाकले आहेत. त्याचसोबत काही हॉटेललाही आगी लावल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाबाबत आतापर्यंत ५० लोकांची ओळख पटली असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच काही लोकांची ओळख असून सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेतली जात असल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय.
हेही वाचा…“राजकीय नेत्यांचे Apple फोन हॅक होताहेत,” जितेंद्र आव्हाडांचं ‘ते’ ट्विट चर्चेत
लोकं घरात असतांना घरं जाळण्याचा जो प्रयत्न झाला आहे. त्याचे सर्व व्हिडीओ फुटेज मिळालेले आहेत. यामध्ये ५० ते ५५ लोकांची ओळख पटली आहे. उर्वरित लोकांची ओळख तपासली जात आहे. या सगळ्या लोकांना पोलिस ३०७ च्या अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केला या कलमाखाली त्यांच्यावर कारवाई करणार आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांची फोनवरून केली २० मिनिटे चर्चा, जरांगे पाटील म्हणाले..
अशा प्रकारे कुणाला मारून टाकण्याचा प्रयत्न. कुणाची संपत्ती उद्धवस्त करण्याचा प्रयत्न होत असेल तर पोलिस बघ्यांची भूमिका घेणार नाही. त्यामुळे अशा प्रकारावत अत्यंत कडक कारवाई करण्यात येणार आहे. मात्र ज्याठिकाणी शांततेत आंदोलन केल जात आहे. त्यावर कारवाई करण्यात येणार नाही. मात्र अहिसेंचं वातावरण निर्माण केलं जात आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही. तोपर्यंत कारवाई करण्यात येईल. या घटना घडत होत्या. त्यामध्ये काही राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते सामील असल्याची माहिती समोर आली आहे. त्याची ओळख पटवून मीडियासमोर आणली जाईल. असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.
🕞 3.30pm | 31-10-2023 📍 Mumbai | दु. ३.३० वा | ३१-१०-२०२३ 📍 मुंबई.
LIVE | Media interaction.#Mumbai #Maharashtra https://t.co/iqBqUlFGGY
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 31, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“तिथे मणिपूर, जळतंय, इथे महाराष्ट्र पेटतंय., मोदी फक्त भाषण करून जातात”
हेही वाचा…मंत्रिमंडळाची बैठक संपन्न, मराठा समाजासाठी एकनाथ शिंदेंनी घेतले मोठे निर्णय
हेही वाचा…“प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील..,” राज ठाकरेंचं मनोज जरांगे पाटील यांना पत्र
हेही वाचा…“गद्दारांच्या अपात्रतेची ‘तारीख’ ठरली !” उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“सर्वात अपयशी आणि नापास गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा”, सुषमा अंधारे यांची मागणी