जळगाव : महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर आमच्यावर टिका करण्यासाठी काही माणसं सोडण्यात आली. परंतु बदनाम तो वो होते है जो बदनाम है वो बदनामी से डरते है. हम तो वो बदनाम है की बदनामी हमसे डरती है. असं म्हणत पाणी पुरवठा मंत्री गुलाबरराव पाटलांनी विरोधकांवर कडाडून प्रहार केला. तसेच 35 वर्ष ज्या संघटनेमध्ये काम केलं होतं. त्या संघटनेला वाचवण्याचं काम आम्ही केलं आहे. असंही ते म्हणाले. जळगावमध्ये गुलाबराव पाटलांची सभा आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ते बोलत होते.
“प्रहार काही आंडूपांडूचा पक्ष नाही, प्रहारमध्ये दहा वार करण्याची ताकद”; बच्चू कडू
बाळासाहेबांच्या शिवसेनेला आजपर्यंत कित्येक लोकं सोडून गेलेत. परंतु आम्ही सोडून गेलो नाहीत. आम्ही तिला पक्क पकडून ठेवलं आहे. निवडणुक जिंकलो काय, निवडणुक हरलो काय, त्यासाठी तुरूंगातपण गेलो. तसेच आता कुठून राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेत. अन् आमच्यावर टिका करायला लागलेत. अस म्हणत त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर देखील निशाणा साधला.
“सत्ता चुलीत गेली, आम्ही जनसामान्यांसाठी सरकारला पाठींबा दिला”; बच्चू कडूंचा एल्गार प्रहार
लोकं साधा ग्रामपंचयातमधील सदस्य सोडायला तयार नाहीत. आम्ही तर मंत्री पद सोडलं होतं. आम्ही शिवसेनेसाठी काम केलं. शिवसेनेच्या पहिल्या आमदाराला निवडणुक आणण्यासाठी आम्ही त्यावेळी कार्यकर्ते होतो. तसेच पुर्वीच्या वेळी राज्याच्या पोटी जन्माला आलेला राजा होत होता. आताचा राजा हा जनतेच्या मतपेटीतून जन्माला येतो. असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
“हम तो वो बदनाम है की बदनामी हमसे डरती है”; गुलाबराव पाटलांची शायरी
ज्यावेळी 40 आमदारांनी उठाव केला होता. त्यावेळी त्यांनी विचार करायला हवा होता. त्यांनी त्यांची बाजू समजून घेतली पाहिजे होती. त्यामुळे आता कुटूंबशाहीचं राजकारण राहिलं नाही तर जनतेचं राजकारण सुरू झालं आहे. तसेच मी 22 हजार गावांना पाणी दिलं आहे . जिथे जिथे जालं तिथे फक्त माझंच नाव लागलं आहे. असंही ते म्हणाले.
Read also
- “मग हे संघ भाजपवाले युपी, गुजरातच्या अंगणात पाणी भरतील”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “भाजप अन् बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्राला उंचीवर नेणार”
- “रवी राणा यांचा राजीनामा घेतला गेला नाही तर..:” सुषमा अंधारेंनी साधला निशाणा
- “राणा, कंभोज, खोत, सदावर्ते, पडळकरांना आता फडणवीसांनी गुजरातला पाठवावे”
- “रवी राणांनी माझी माफी मागितली, त्यांचे जाहीर आभार”; बच्चू कडूंनी वाद मिटवला