मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. त्यावरून आता शिवसेना आणि शिंदे गटातील बंडखोर आमदारांमध्ये जोरदार टिका टिप्पणी सुरू आहे. उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदारांवर आपल्या जाहीर भाषणांमधून बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहेत. 50 खोके घेऊन राज्यात बेकायदेशीर सरकार स्थापन केल्याचंही ते सातत्याने सांगत आहेत. यावर आता कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
6 जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळायला ‘फडणवीस’ ‘स्पायडरमॅन’ आहेत का ? नाना पटोले
अडीच वर्षात जे जमलं नाही, ते अडीच महिन्यात झालं. 20 दिवसांपुर्वी आमची बैठक झाली होती. मागच्या सरकारमध्ये केवळ फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर जात होती. मुंबईत महानगरपालिकेत पैसे खाणारे कोण बोके होते? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही सुद्धा शिव्यांची पीएचडी केली आहे. आम्ही केवळ शिंदेंना पाठिंबा दिला म्हणून गद्दार का ? एकही रूपया मी घेतला असेल तर दाखवून द्या. मी राजकीय सन्यांस घेतो असं आवाहन देखील उदय सामंत यांनी केलं आहे.
“राज्यात ‘भारत जोडो’ यात्रेत राष्ट्रवादी सहभागी होणार, शिवसेनेचा निर्णय अंधातरी”
दरम्यान, वेदांता प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले की, वेदांता प्रकल्प राज्यात आलाच नव्हता. कुठेच सही झालेली नाही, कोणतीही जमीन दिलेली नाही. उद्या एमआयडीसी बोर्डाची बैठक आहे. मला उद्योग खातं कळत नाही. अशी टिका माझ्यावर करण्यात येते. पण जमीन घेणं आणि विकणं एवढचं नाही तर रोजगार निर्मिती करणं हे देखील महत्वाच असल्याचं त्यांनी सांगितलं.
Read also
- “अंगाला हळद लावून बसलेले बच्चू कडू लग्न लवकर होईना म्हणून..;” राष्ट्रवादीने डिवचलं
- महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार; आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत
- ठरलं तर..! शिवसेना नेमकी कुणाची? निवडणुक आयोगाने केलं स्पष्ट
- “महाराष्ट्र मॉडेलच सर्वोत्तम पाहिजे, गुजरातला कशाला जातात”?; रूपाली पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा
- “शरद पवारांनी फक्त एक महाराष्ट्राचा दौरा केल्यावर लगेच ते सत्तेवर बसतात”; सुप्रिया सुळे