मुंबई : वेदांत प्रकल्पावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टिका टिप्पणी सुरू आहे. यातच आता गुजरात मॉडेल समजून घेण्यासाठी राज्यातील कॅबिनेट मंत्री गुजरातमध्ये गेल्याने त्यांच्यावर आता राष्ट्रवादीने जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा पेटलं आहे.
“महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करतय”; काॅंग्रेसची जहरी टिका
गुजरात विकास मॉडेल अभ्यासासाठी राज्याचे वनमंत्री आणि उद्योगमंत्री गुजरातला जातात एवढी मोठी नामुष्की शिंदे-फडणवीस सरकारमुळे महाराष्ट्रावर आली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. ईडी सरकारचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना महाराष्ट्रात गुंतवणूक कशी आणायची याचा अभ्यास करण्यासाठी गुजरातला जावं लागतं याच्यासारखे दुर्दैवी सरकार महाराष्ट्रात असूच शकत नाही, असा टोला महेश तपासे यांनी लगावला.
“जर निवडणूक चिन्हावरून विवाद असेल तर आम्हाला…;” प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्र हा गुंतवणूकदारांसाठी अव्वल नंबर राहिला आहे. देशात महाराष्ट्राचे आगळेवेगळे महत्त्व आहे. त्याच महाराष्ट्रात ईडीसरकार आल्यावर फॉक्सकॉनसारखा प्रकल्प, महत्वाची कार्यालये गुजरात पळवून नेली जातात ही शोकांतिका आहे, असेही महेश तपासे म्हणाले. तर प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा निष्काम याच मंत्र्यांच्या कामगिरीमुळे धुळीस मिळत आहे. महाराष्ट्र मॉडेलच सर्वोत्तम पाहिजे, गुजरातला कशाला जातात? असा सवाल करत रूपाली पाटलांनी शिंदे- फडणवीस सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधला.
“माझा पक्ष, विचार वेगळे पण मी पंकजा मुंडेंच्या पाठीशी”; रूपाली पाटील
गुजरात हे सगळे नेत असताना राज्यातील भाजप नेते हतबलतेने बघत आहेत. राज्यातील नागरिकांना, उद्योगपतींना महाराष्ट्रावर विश्वास आहे. मात्र सरकारची विश्वासार्हता काय असा प्रश्न उद्योगजगतातील लोकांच्या मनात निर्माण झाला आहे, असे तपासे यांनी सांगितले.
Read also
- “शरद पवारांनी फक्त एक महाराष्ट्राचा दौरा केल्यावर लगेच ते सत्तेवर बसतात”; सुप्रिया सुळे
- 6 जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळायला ‘फडणवीस’ ‘स्पायडरमॅन’ आहेत का ? नाना पटोले
- “राज्यात ‘भारत जोडो’ यात्रेत राष्ट्रवादी सहभागी होणार, शिवसेनेचा निर्णय अंधातरी”
- “भाजपचं पितळ उघडं पाडायला आम्ही सदैव तयार”; काॅंग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
- हिंदुहिताच्या पोकळ गप्पा मारणाऱ्यांनो, महागाईच्या विळख्यातून कधी बाहेर काढणार? रूपाली पाटलांचा सवाल