मुंबई : राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू आहे. अशातच एकनाथ शिंदे सरकारने नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तब्बल 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री पदावरून आता काॅंग्रेसने भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार”; एकनाथ शिंदे
शिंदे-फडणवीस सरकारने तीन महिन्यानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सर्वांत गंभीर बाब म्हणजे सहा जिल्ह्याला एकच पालकमंत्री दिला आहे. हा पालकमंत्री काय स्पायडरमॅन आहे का? असा सवाल काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच सहा जिल्ह्याच्या विकास कामांसाठी ते वेळ कसा देणार ? असा सवाल उपस्थितत करत या दोघांच्या वादात जिल्ह्यातील विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. अशी टिका देखील त्यांनी केली आहे.
गुजरात मॉडेल अभ्यासासाठी राज्यातील मंत्री गुजरातमध्ये..! राष्ट्रवादीची टिका
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री स्वत: मोदी-शाह यांचे हस्तक असल्याचे जाहीरपणे सांगतात. महाराष्ट्रातील उद्योगधंदे व गुंतवणुक गुजरातमध्ये पाठवली जात आहे. आता तर महाराष्ट्राचे दोन मंत्री गुजरातमध्ये जाऊन आले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये कसे पाठवायचे याचा अभ्यास करायला ते गेले होते काय? असा सवाल उपस्थित करत त्यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला.
राजकीय लढाई सुरू असताना मुख्यमंत्र्यांचे धडाकेबाज निर्णय; वाचा संपुर्ण यादी
दरम्यान, राज्यातील इडीचे सरकार असंवैधानिक आहे हे आम्ही सुरूवातीपासूनच सांगत आहोत. दुसरीकडे महागाईने जनता त्रस्त आहे. मध्यमवर्गही महागाईने पिचला आहे. पण केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या महागाई राज्य सरकारने कमी करावी असे म्हणत आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करत आहे, त्यामुळे निर्मला सितारमण यांनी सांगितल्याप्रमाणे महागाई कमी करण्यासाठी ते काय करतात ते पहावे लागेल असंही नाना पटोले म्हणाले.
Read also
- “जर निवडणूक चिन्हावरून विवाद असेल तर आम्हाला…;” प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
- “माझा पक्ष, विचार वेगळे पण मी पंकजा मुंडेंच्या पाठीशी”; रूपाली पाटील
- “मोदींनी जरी ठरवलं तर ते मला संपवू शकत नाही”; पंकजा मुंडेच्या वक्तव्यानंतर राज्यात खळबळ
- “त्यांची आता जळजळ, मळमळ, कळकळ सुरूय”; भाजपचं शिवसेनेला प्रत्युत्तर
- “कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही”; सेनेकडून भाजपचा पुन्हा एकदा ‘कमळाबाई’ उल्लेख