मुंबई : काॅंग्रेस खासदार यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. तसेच भारत जोडो यात्रा महाराष्टातून जाणार असून या यात्रेत राज्यातील विविध पक्ष सहभागी होणार असल्याचं काॅंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. यावरून भाजप आणि काॅंग्रेसमध्ये जोरदार टिका टिप्पणी सुरू आहे. यातच त्यांनी आता जीडीपीवरून भाजपवर निशाणा साधला आहे.
“त्यांची आता जळजळ, मळमळ, कळकळ सुरूय”; भाजपचं शिवसेनेला प्रत्युत्तर
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काॅंग्रेसवर घणाघात चढवला आहे. काॅंग्रेसच्या काळात भारताची अर्थव्यवस्था ही जगातल्या ११ व्या स्थानी होती. तिच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाचव्या स्थानावर आली असल्याचं शहांनी म्हटलं आहे. तर २०११ साली जपानला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था ही ५ व्या क्रमांकावर होती असं काॅंग्रेसने म्हटलं असून आता ती ६ व्या क्रमांकावर आहे. ती सांगायला भाजपला लाज वाटत आहे. अशी टिका काॅंग्रेसने केली आहे.
“कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही”; सेनेकडून भाजपचा पुन्हा एकदा ‘कमळाबाई’ उल्लेख
तसेच पुढे काॅंग्रेसने असं म्हटलं आहे की, अर्धवट सांगून काॅंग्रेसची बदनामी करून स्वत: च अपयश झाकता येईल असं जर शाहांना वाटत असेल तर त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी. भाजपचं पितळ उघडं पाडायला आम्ही सदैव तयार आहोत..! असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. त्यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार त्या पहाणं महत्वाच्या ठरणार आहेत.
Read also
- हिंदुहिताच्या पोकळ गप्पा मारणाऱ्यांनो, महागाईच्या विळख्यातून कधी बाहेर काढणार? रूपाली पाटलांचा सवाल
- “महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करतय”; काॅंग्रेसची जहरी टिका
- “जर निवडणूक चिन्हावरून विवाद असेल तर आम्हाला…;” प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
- “माझा पक्ष, विचार वेगळे पण मी पंकजा मुंडेंच्या पाठीशी”; रूपाली पाटील
- “मोदींनी जरी ठरवलं तर ते मला संपवू शकत नाही”; पंकजा मुंडेच्या वक्तव्यानंतर राज्यात खळबळ