अकोला : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला आज २१ दिवस होत आहेत. भारत जोडोला यात्रेला लोकांचा प्रतिसाद देखील मोठा मिळत आहे. महराष्ट्रात देखील राहुल गांधींची ही यात्रा येणार असून महाराष्ट्रात नांदेड आणि अकोल्यात राहुल गांधी सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी मोठी तयारी सूरू करण्यात आली आहे.
“मोदींनी जरी ठरवलं तर ते मला संपवू शकत नाही”; पंकजा मुंडेच्या वक्तव्यानंतर राज्यात खळबळ
यातच काॅंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही पुढील आठवड्यात भारत जोडो यात्रा काढण्यात येणार आहे. यात राष्ट्रवादी काॅंग्रेस सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय शेकाप, सीपीआय, सीपीएम आणि जनता दलासह काही स्वंयसेवी संस्थाही यात सहभागी होणार असल्याचे मुंबई काॅंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांने सांगितले आहे.
“त्यांची आता जळजळ, मळमळ, कळकळ सुरूय”; भाजपचं शिवसेनेला प्रत्युत्तर
तसेच राज्यातील अनेक राजकीय पक्ष भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. अनेक राजकीय पक्षांना आम्ही पत्र देखील पाठवलं असल्याचं काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मात्र या यात्रेला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसेनेकडे प्रस्ताव देण्यात आला असून, लवकरच याबाबत अंतिम घोषणा केली जाणार असल्याचे समजत आहे.
Read also
- “भाजपचं पितळ उघडं पाडायला आम्ही सदैव तयार”; काॅंग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
- हिंदुहिताच्या पोकळ गप्पा मारणाऱ्यांनो, महागाईच्या विळख्यातून कधी बाहेर काढणार? रूपाली पाटलांचा सवाल
- “महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करतय”; काॅंग्रेसची जहरी टिका
- “जर निवडणूक चिन्हावरून विवाद असेल तर आम्हाला…;” प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
- “माझा पक्ष, विचार वेगळे पण मी पंकजा मुंडेंच्या पाठीशी”; रूपाली पाटील