मुंबई : अमरावतीचे अपक्ष आमदार बच्चू कडू आपल्या वेगवेगळ्या कारणांमुळे राजकीय क्षेत्रात नेहमी चर्चेत राहतात. अशातच रस्त्याच्या कामानिमित्ताने गेलेल्या बच्चू कडूंनी सर्वांसमोर आपल्याच कार्यकर्त्यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगू लागली आहेत. तसेच अनेक ठिकाणांहून त्यांच्यावर प्रखर शब्दात टिका केली जात आहे. यातच आता राष्ट्रवादीचे युवासेनेचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी बच्चू कडूंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“राज्यात ‘भारत जोडो’ यात्रेत राष्ट्रवादी सहभागी होणार, शिवसेनेचा निर्णय अंधातरी”
अचलपुर तालुक्यातील गणोजा गावात बच्चू कडू एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी गेले. मात्र रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने गदारोळ झाला आणि संतापलेल्या बच्चू कडूंनी थेट आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. रस्त्याचं काम ज्या भागासाठी मंजूर झालं होतं त्या भागात रस्ता झाला नाही, असा प्रमुख आक्षेप तक्रारकर्त्या केला. तसेच ज्या भागात रस्त्याचं काम झालं नाही तो कुठे गेला असा सवाल केला. यावर बच्चू कडू संतापले आणि मुर्खासारखे काहीही बोलतो असं वक्तव्य केलं.
“भाजपचं पितळ उघडं पाडायला आम्ही सदैव तयार”; काॅंग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
अंगाला हळद लावून बसलेले बचू कडू वेळेवर लग्न होईना म्हणून कार्यकर्त्याच्या अंगावर हात टाकायला लागलेत. असा टोला सुरज चव्हाण यांनी बच्चू कडूंना लगावला. त्यानंतर बच्चू कडूंनी ठेकेदार आणि इंजिनियरसमोरच कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेतली. मात्र, ठेकेदार रस्त्याचं काम योग्य झालं म्हणत होता, एक कार्यकर्ता कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत होता. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी शिंदे सरकारवर प्रखर शब्दात टिका केली आहे.
हिंदुहिताच्या पोकळ गप्पा मारणाऱ्यांनो, महागाईच्या विळख्यातून कधी बाहेर काढणार? रूपाली पाटलांचा सवाल
शिंदे फडणवीस सरकारच्या बंडखोर आमदारांना सत्तेचा माज आला आहे. कायदा सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना गृहमंत्री काय करतात? लोकप्रतिनिधी आता प्रश्न विचारणाऱ्याच्या कानशिलात मारू लागलेत. बंडखोर आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांच्या कानशिलात लगावली. हा मंत्रीपद न मिळल्याचा राग आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
Read also
- महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार; आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत
- ठरलं तर..! शिवसेना नेमकी कुणाची? निवडणुक आयोगाने केलं स्पष्ट
- “महाराष्ट्र मॉडेलच सर्वोत्तम पाहिजे, गुजरातला कशाला जातात”?; रूपाली पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा
- “शरद पवारांनी फक्त एक महाराष्ट्राचा दौरा केल्यावर लगेच ते सत्तेवर बसतात”; सुप्रिया सुळे
- 6 जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळायला ‘फडणवीस’ ‘स्पायडरमॅन’ आहेत का ? नाना पटोले