मुंबई : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटातील आमदार भरतशेठ गोगावले मंत्रिपदावरून सातत्याने चर्चेत राहिले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तारात मला १०० टक्के मंत्रीपद मिळणार असा दावा देखील गोगावले करतांना दिसत आहेत. तर विरोधी पक्षांकडून देखील सातत्याने गोगावले यांच्यावर शाब्दिक टोलेबाजी केली जात आहे. यावर आता गोगावले यांनी मंत्रिपदाबाबत मौन सोडलं आहे.
हेही वाचा…“काॅंग्रेसचा डीएनए महात्मा गांधीचा नाही तर..,’ भाजपचे खासदार अन् यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक वार
एकनाथ शिंदे यांनी कोणतीही अडचण निर्माण केली नाही, ती खरी तर अडचण आम्हीच केली आहे. कारण सुरूवातीला एकनाथ शिंदे यांनी मला पहिल्याच लिस्टमध्ये घेतले होते. परंतु नंतर संख्या वाढल्याने एकनाथ शिंदे विचारमग्न झाले अन् त्यांनी मला विचारले की नेमकं काय करायचं ? त्यावेळी येणाऱ्यांमध्ये सर्वच जण टाईट होते. मोठे होते. त्यावर एक महिन्याचा तर प्रश्न आहे, असं मानून मी थांबतो असं शिंदेंना म्हणालो. परंतु अजूनही थांबलो आहे.
हेही वाचा…“सरकारमध्ये १०० दिवस पूर्ण, स्वत: चा उल्लेख राष्ट्रवादीचे अध्यक्ष करत अजिदादांचं पत्र”
भाजपवर आमच्याकडून कोणताही दबाव टाकण्यात आला नाही. पद शिल्लक होती, त्यांची मध्यंतरी मागणी करीत होतो. मंत्रिपदासाठी अजूनही आशावाद असं म्हणत दिलंतर दिलं नाही तर नाही. असंही गोगावले यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत आम्ही येत नाही. तोपर्यंत रायगडचं पालकमंत्री पद पक्षाकडे राहावं, असंच आमचं म्हणणं आहे. कारण जिल्ह्यात शिवसेना-भाजप युतीचे प्रत्येकी तीन तीन आमदार आहेत. या सहा आमदारांनी माझी पालकमंत्री म्हणून शिफारस केली असल्याने रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री मुख्यमंत्र्यांनी राखून ठेवलं आहे. असंही गोगावले म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…महाराष्ट्राच्या तळागाळातून ठाकरेंना पाठिंबा, मातोश्रीवर हजारो कार्यकर्त्यांनी बांधलं शिवबंधन
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी चित्रा वाघ यांना लगावला टोला, म्हणाल्या, अहो चित्राताई, अगोदर..,
हेही वाचा…शिवाजी पार्क मैदानावरून दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने माघार का घेतली ? शिंदे गटातील आमदाराने दिले स्पष्टीकरण
हेही वाचा…२०२४ च्या लोकसभेसाठी ठाकरेंचा उमेदवार ठरला, बैठकीत ‘या’ नेत्यांवर केला शिक्कामोर्तब
हेही वाचा…पुणे लोकसभेसाठी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनी सुचवलं ‘या’ नेत्याचं नाव