मुंबई : भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं रविवारी सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्यावर शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. काँग्रेसचे प्रमुख नेते व काँग्रेसचे मुंबईतील मंत्री मात्र तिथं उपस्थित नव्हते. त्यावरून चर्चा सुरू झाली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत खुलासा केला आहे.
प्रचारादरम्यान मतदारांनी फ्रान्सिस डिसोझा यांच्या आठवणींना दिला उजाळा; जोशुआ झाले भावूक
‘बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे सर्वजण करोनाबाधित आहेत. त्यामुळे ते काल लतादीदींच्या अंत्यदर्शनाच्या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत. माझ्या बहिणीच्या सासू वारल्यामुळे मी तिकडे होतो. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या मुंबईबाहेर होत्या. शनिवार, रविवार असल्यामुळं अनेकांचे दौरे होते. अनेकांना कनेक्टिव्हिटी नव्हती, त्यामुळं आम्ही पोहोचू शकलो नाही,’ अशी माहिती पटोले यांनी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे अंत्यविधीला उपस्थित होते, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं आहे.
गोवा विधानसभा निवडणूक: पंतप्रधान नरेंद्र मोदींची म्हापसा मतदार संघात होणार सभा
‘लतादीदी या काँग्रेस परिवारातल्याच होत्या. त्यांचं योगदान मोठं आहे. काँग्रेसच्या वतीनं सर्व ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. तालुका पातळीवरही श्रद्धांजलीचे कार्यक्रम होणार आहेत. मी स्वत: लतादीदींच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे, असंही पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
Read also:
- एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री; ठाण्यातील कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरबाजीची राज्यभर चर्चा
- बाबूश यांच्या पावलावर पाऊल ठेऊनच जोशुआचं मार्गक्रमण – सदाभाऊ खोत
- किशोरी पेडणेकरांना देवेंद्र फडणवीसांनी दिली लिफ्ट; गोवा ते मुंबई प्रवासाची राज्यभर चर्चा
- मोठी बातमी: नितेश राणेंच्या छातीतील दुखणे वाढले, सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातून कोल्हापूरला हलवलं
- शाहरुख खानला ट्रोल करणं हा नालायक आणि बेशरमपणा आहे – संजय राऊत