जालना : महाराष्ट्रात करोना व्हायरस महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचे चित्र गेल्याकाही दिवसात पाहायला मिळाले होते. आता करोनारुग्णांची संख्या कमी होत चालली असताना नवीन समस्या समोर आली आहे. करोनारुग्णांना म्युकरमायकोसीस नावाचा बुरशीजन्य आजार होत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त आहे.
आता या आजाराच्या जाणीवजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
राजेश टोपे म्हणाले की, ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे. ते जालना येथे बोलत होते.
या आजारात नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका आढळून येत आहे. लवकर उपचार नाही केले तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगतानाच या आजाराचे लवकर निदान होणे गरजेच असल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये जाणीवजागृती करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शन देखील चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून त्याची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाईल, असे टोपे म्हणाले.
Read Also :
- “भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावललं जातंय, मुंडेंचा झाला सर्वाधिक छळ”, खडसेंचा गंभीर आरोप
- “परदेशातून काय आलं हे मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांनाच विचारा”, जयंत पाटलांच्या टीकेला दरेकरांचे प्रत्युत्तर
- काँग्रेसने केले मान्य, नरेंद्र मोदींनी देशाला दिल्या “या” तीन गोष्टी
- दरेकरांचा एवढा कसला महाराष्ट्र द्वेष; की त्यांना काय आरोप करावेत याचं देखील भान नाही?
- मराठा बांधवांसाठी राज्य सरकार जाणार परत सुप्रीम कोर्टात, दाखल करणार पुनर्विचार याचिका