परळी: मी राजकारणात कधीही दिखाऊपणा केला नाही, आणि करणार ही नाही, राजकारणात प्रामाणिकपणे काम केल्यामुळे जनतेने मला डोक्यावर घेतले आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जगमित्र संपर्क कार्यालयासमोर वाल्मिक कराड यांनी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. तसेच इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणूक जिंकणार आपणच जिंकणार असा विश्वास देखील दाखवला आहे.
हे पण वाचा: राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण, एकामागोमाग एक ३ मोठ्या बैठका; पवारांच्या मनात चाललंय तरी काय?
धनंजय मुंडे म्हणाले की, मुलगी वैष्णवी अमेरिकेत आहे, तिकडे जाऊन वाढदिवस साजरा करवा का? असे अनेक प्रश्न होते. अमेरिकेत जर केला तर पंधरा दिवस क्वारंटाइन व्हावे लागगे, त्यापेक्षा आपल्या मायभूमीत कायमस्वरूपी क्वारंटाइन होण्यास तयार आहे. म्हणून इथेच वाढदिवस साजरा केला. स्वतःच्या जन्मावर स्वतःच काय बोलावे, हा प्रश्न आहे. जगात यापेक्षा कोणतेही अवघड काम नाही.
हे पण वाचा: शरद पवारांनी स्पष्ट करावं की, ते नक्की कोणत्या पदाचे उमेदवार आहेत – सुधीर मुनगंटीवार
मी राजकारण करत गेलो. अनेक सहकारी सोबत आले, मला नेता म्हणायला लागले. आमच्या राजकारणात प्रामाणिकपणा आहे; म्हणून लोकांनी डोक्यावर घेतले. दिखाऊपणा करु नका, असा संदेश कार्यर्त्यांना बोलताना दिला. अनेक निवडणुका लढलो आणि पडलोपण. पण, भविष्यात प्रत्येक निवडणूक जिंकणार आहे. तुमच्या विश्वासाने कोरोना काळात जिवंत ठेवले. समाजकारणात राजकारण केले नाही, समाजकारणच केले. समय के साथ बदलना होता है! काही जण म्हणाले, मनात राजकारण आणले नव्हते. पण, आता आणणार, हे मी जन्मादिवशी ठरवले आहे. सत्तेतील राजकारणात ज्याचा दोष नाही, त्याला दोष दिला जातो. हे माझ्या बाबतीत घडले आहे, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली.
हे पण वाचा:राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार? अखेर शरद पवारांनी सोडलं मौन
धनंजय मुंडे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक झाला. राजे सिंहासनावर बसत असताना प्रत्येक पायरीवर एक अश्रू पडत होता. ते अश्रू स्वराज्यासाठी खस्ता खाललेल्यासांठी होते. इथेही मला माहिती आहे, मला इथपर्यंत पाठवण्यासाठी अनेकांनी खस्ता खालल्या आहेत. याची मला जाणीव आहे. ज्या काळात लोक शिव्या देत होते, त्यावेळी शरद पवार, अजित पवार यांनी मला विरोधी पक्षनेते पद दिले, हे मी कधीही विसरणार नाही.’’