मुंबई : गेले कित्येक दिवस राज्याचं राजकारण सातत्याने धुमसत आहे. यातच आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सहयाद्री अतिथी गृहात मंत्र्यांसोबत बैठक घेतल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ निवास्थानी भेट घेतली. दरम्यान, त्यांच्या या भेटीने पुन्हा राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांतील ही तिसरी भेट आहे.
महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली; ८ आमदार ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार?
अर्ध्या तासाच्या बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता…
- १९ जुलैपासून संसदेचं अधिवेशन सुरु होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादीची काय भूमिका आणि मुद्दे असावेत यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. तसेच, आज त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर कृषी विषयक प्रश्नांचा आढावा घेतला. यावेळी केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात चर्च झाली. यावर देखील चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
- केंद्र सरकारने नव्याने निर्माण केलेल्या सहकार खात्याची सूत्र अमित शाह यांच्याकडे आहेत. त्यात राज्यात सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्राशी अनेक मुद्दे संबंधित मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.
- काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेवर आणि भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सरकार पाडण्याचा जो प्रयत्न सुरु केला आहे, त्यावरही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
- तसेच, शरद पवार-प्रशांत किशोर आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील नेते विरोधकांची एक मोट बांधण्याचा प्रयत्न करु पाहत आहेत. यावर देखील चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
- दुसरीकडे आज, सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादा भूसे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. राज्यातील विविध प्रश्नांवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महामारी काळात उत्तम काम केलं आहे. एका वडिलांप्रमाणे त्यांनी भूमिका निभावली आहे. त्यामुळे ते लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहे’, असं कौतुक शरद पवार यांनी केल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं आहे.
- दरम्यान, या भेटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे, एकनाथ खडसे यांना घेऊन देखील या भेटीत या विषयांवर काही चर्चा झाली आहे का, याकडेही लक्ष लागून आहे.
राष्ट्रवादीच्या बारामतीत भरणार, काँग्रेसचा ओबीसी मेळावा; नाना पटोलेंच्या भूमिकेकडे लक्ष
Read Also :
- शिवसेना उचलणार स्वप्निलच्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च, केली १० लाखांची मदत
- इयत्ता १० वीचा निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार
- घटक पक्षांचा ठाकरे सरकारला इशारा, कृषी विधेयकं मागे घ्या, अन्यथा..
- …आणि फडणवीस म्हणाले…”पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही, त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही”
- २३ गावांच्या आराखड्याच्या निर्णयाच्या बाबतीत महाविकास आघाडीची वजीर चाल ‘सक्सेसफुल’