मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2022-23 साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच मुंबईत मराठी भाषा भवन बांधण्यासाठी 100 कोटी रूपयाची तरतुद देखील करण्यात आली आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून मराठी भाषांवर लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या. त्यावर अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
महाराष्ट्रातील सत्तांतर अटळ, महाराष्ट्रात पर्यायी सरकार देऊ : देवेंद्र फडणवीस
माहिती व जनसंपर्क विभागाला यावर्षी 250 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच मराठी भाषा विभागाला 50 कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील दुकानांवर फलक मराठीत असणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं आहे. भिलार या गावांवरून आता प्रत्येक जिल्हात 1 पुस्तकांच गाव देखील असणार आहे. या वर्षी राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता वर्ष म्हणून पाळण्यात येणार आहे. तसेच राजगडच्या पाल येथील सईबाई यांच्या स्मृतिस्थान विकासासाठी निधी व संदुबरे तालुका मावळ या क्षेत्राच्या विकासासाठी 10 कोटी रूपयांची तरतुद देखील करण्यात आली आहे.
आता पुढचं टार्गेट महानगरपालिका! विधानसभा निवडणुका निकालानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
राज्याच्या पर्यटन विभागाला देखील भरभरून निधी देण्यात आला आहे. यात रायगड किल्ला आणि परिसर विकासासाठी 100 कोटी देण्यात आले आहेत. जलजीवन मिशन योजनेसाठी 1 हजार 600 कोटी तर मुख्यमंत्री ग्रामीण पेय जल मिशनसाठी पाणीपुरवठा विभागाला 3 हजार कोटी देण्यात आले आहेत. तसेच मुंबई, पुणे आणि नागपुर याठिकाणी हेरिटेज वॉक तयार करण्यात येणार आहे. तर पालघर जिल्हाला ब वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अजिंठा वेरूळ साठी सर्वागीण विकास आराखड्याचे देखील विचार करण्यात आला आहे.
Read also:
- अर्थसंकल्प 2022! एसटी आंदोलनावर यंदाच्या अर्थसंकल्पात तात्पुरती मलमपट्टी; वाचा
- महिला, शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येणार! वाचा यंदाचा अर्थसंकल्प
- देवेंद्र फडणवीस असे 10-20 पवार खिशात घालून फिरतात! गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
- लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची अवस्था काॅंग्रेससारखी होईल, त्यांनी भाजपसोबत यावे रामदास आठवले
- भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही! अमोल मिटकरींची भाजपवर खरमरीत टीका