मुंबई : देशातील पाच विधानसभासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने चार राज्यांत दणदणीत विजय मिळवला आहे. यावरून भाजपच्या नेत्यांकडून देशात मोदी लाट कायम असल्याचं सांगितलं जात आहे. तर सत्ताधारी पक्षांकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विधानसभा आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
उन्हें पराजित कौन करेगा, जिसके रक्षक राम हैं! उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी
अमोल मिटकरी म्हणाले की, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अनेक टिव्ही चॅनेलवर मोदी लाट काय असल्याचं दाखवण्यात येत आहेत. परंतु या पाच राज्यांच्या व्यक्तिरिक्त माहिती घेतल्यास विधानसभेमध्ये भाजपची परिस्थिती अत्यंत वाईट आहे.
गोव्यातील विजयाबद्दल फडणवीसांनी सांगितली दोन नावं! गोव्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा
देशातील 29 राज्यांपैकी केवळ 10 विधानसभांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत आहे. तर तीन राज्यांमध्ये त्यांना भोपळाही फोडता आला नाही. सहा राज्यांमध्ये भाजपला एक अंकी जागा मिळाल्या आहेत. युतीचं सरकार असलेल्या 4 राज्यांमध्ये भाजपला अल्प जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही. प्रत्यक्षात देशात 66 टक्के जागांवर भाजपचा पराभव झाला असल्याची टीका देखील अमोल मिटकरी यांनी केली आहे.
गोव्यातील विजयाबद्दल फडणवीसांनी सांगितली दोन नावं! गोव्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा
दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर होऊन आम्ही पर्यायी सरकार देऊ,असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुकांदेखील होऊ घातल्या आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण कोणत्या दिशेने जाणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- महाराष्ट्रातील सत्तांतर अटळ, महाराष्ट्रात पर्यायी सरकार देऊ : देवेंद्र फडणवीस
- महाराष्ट्रातील सरकार लवकरच पडणार! काॅंग्रेस खासदार कुमार केतकर यांचं वक्तव्य
- आता पुढचं टार्गेट महानगरपालिका! विधानसभा निवडणुका निकालानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
- विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसचा सुपडा साप! राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया
- मोदी-योगींच्या ‘व्हीजन ऑफ डेव्हलपमेंट’ला देशवासीयांची साथ : आमदार महेश लांडगे