मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कल लागला असुन भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा भाजपला मोठा विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे पुढील उत्तर प्रदेशाचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या विजयाबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सगळीकडे खिचडी होऊ शकते; परंतु गोव्यात नाही! संजय राऊत यांचं भाकित
चंद्रकांत पाटलांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, अंतिम विजय हमारी होगी निश्चित ये परिणाम है, उन्हें पराजित कौन करेगा, जिसके रक्षक राम है, असं म्हणत त्यांनी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे. तसेच त्यांनी निवडणुकींच्या निकालात दिसत असणारा करिष्मा केवळ चेहऱ्याचा किंवा बोलण्याचा नसुन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांचा आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
विरोधकांनी भाजपचे तिकीट मिळविण्यासाठी किरीट सोमय्याला चुकीची महिती दिली – आमदार सुनिल शेळके
उत्तर प्रदेशमध्ये बहुमतासाठी 202 जांगाची गरज असतांना भाजपने 270 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी सध्या 125 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आता भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. उत्तर प्रदेश पाठोपाठ मणिपुर, गोवा, आणि उत्तराखंड राज्यात देखील भाजप आघाडीवर आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात देखील भाजपचे कार्यकर्ते पेढे वाटून आनंद साजरा करीत आहेत.
Read also:
- गोव्यातील विजयाबद्दल फडणवीसांनी सांगितली दोन नावं! गोव्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा
- केजरीवालांचा आता बहुतेक शिवसेना भवनात जंगी सत्कार! अति विराट सभा, झंझावती दौरा
- महाराष्ट्र अभी बाकी है म्हणताय महाराष्ट्र तैयार है: शरद पवार यांचे भाजपला प्रतिआव्हान
- लोकांचा आवाज हा देवांचा आवाज, आपचे अभिनंदन! नवज्योत सिंग सिद्धू यांचे ट्विट
- आमदार महेश लांडगे यांनी गोव्याचे मैदान मारले; जोशुआ डिसोझा यांचा दमदार विजय!