मुंबई : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी होत आहे. पंजाब राज्य वगळता उत्तराखंड, मणिपुर, उत्तर प्रदेश आणि गोव्यात भाजप आघाडीवर आहे. तर यावेळी मैदानात उतरलेल्या शिवसेनेला अद्यापही खातं उघडता आलं नाही. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भाजप माहीर! फडणवीसांच्या राजकीय बॉम्बवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
मतमोजणी बद्दल संजय राऊत बोलताना म्हणाले की, अजूनही मतमोजणी सुरू आहे. पोस्टल बॅलेटवर तुम्ही जावू नका. त्यावर संयमाने बोलायला हवं. तुम्ही बिहारमध्ये 20-20 फेऱ्या होत असताना काय झालं होतं ते तुुम्ही बघितलं आहे. त्यामुळे निकाल अजून बाकी आहे. पंजाबमध्ये देखील परिस्थिती अजूनही स्पष्ट झाली नाही. सर्व राज्यांमध्ये पूर्ण निकाल येईपर्यंत उद्याची सकाळ उजाडेल. गोव्यात माझ्यामते कुणालाही बहुमत मिळत नाही आहे. त्यामुळे त्याठिकाणी खिचडी बऱ्याच ठिकाणी बनु शकते. फक्त गोव्यात नाही. असंही संजय राऊत म्हणाले.
नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शातं बसणार नाहीत! फडणवीसांचा हल्लाबोल
आम्ही प्रत्येक ठिकाणी चांगलं काम केलं आहे. तसेच ज्या वेळी राजकीय पक्ष राज्यांबाहेर जातो . त्यावेळी त्याला पहिल्यांदा संघर्ष करावा लागतो. आम्ही पक्ष बाहेर नेण्याची सुरूवात केली आहे. आम्ही थांबणार नाहीत. असंही यावेळी ते म्हणालेत.
नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा मोर्चो ! फडणवींसासह अनेक भाजप नेते आझाद मैदानावर
आज सायंकाळपर्यंत पाच राज्यांचा निकाल हाती येऊ शकतो. उत्तर प्रदेश मध्ये भाजप सत्ता राखण्यास यशस्वी ठरत असल्याचं सध्या चित्र दिसत आहे. तर अखिलेश यादव यांचा समाजवादी पार्टी हा देखील पक्ष भाजपला कडवी टक्कर देताना दिसत आहे. तर तिकडे पंजाबमध्ये काॅंग्रेस पार्टीचा सुपडा साफ होताना दिसत असून अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षांनी सध्या आघाडी घेतली आहे.
Read also:
- आमचं राजकारण नकलांवर उभं नाही; संजय राऊतांचा राज ठाकरे यांना प्रत्युत्तर
- महाविकास आघाडीतील काही उपटसुंभ नेत्यांमुळे कामगारांची फसगत! एसटी संपावर प्रकाश आंबेकरांची प्रतिक्रिया
- नाटकातील सरपंच, मंजुळाबाई, गोप्या, मास्तर कोण? अंक अजून बाकी! शेलारांचा सरकारला इशारा
- महाविकास आघाडी सरकारवर शरद पवार नागासारखे बसलेत! नितेश राणेंची जहरी टीका
- राज्यभर आम्ही लढा उभारू अन् तुमचं जगणं मुश्किल करून टाकू! चंद्रकांत पाटलांचा इशारा