मुंबई : दाऊद इब्राहिमशी संबंधित जमीन व्यवहार केल्याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सध्या तरूंगात आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आझाद मैदानावर भव्य मोर्चोचे आयोजन केले आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष नवाब मलिकांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला
नवाब मलिकांनी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून 25 रूपये चौरस फुट दराने जमीन विकत घेतली. त्यामुळे दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या मंत्र्याला मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही आहे. हा संघर्ष देशद्रोहाच्या विरोधातील आहे. जो पर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शातं बसणार नाहीत. महाराष्ट्रात रोज घटना घडताहेत. त्यासाठी आम्ही रोज आंदोलन करत नाहीत. तर हा मुद्या महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे.
आर्यन खान प्रकरणात शिवसेना, काँग्रेस मंत्र्यांचा समावेश; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा
बॉम्बस्फोटीतील आरोप शहावली खानने याकुम मेनन सोबत बसून मुंबईच्या बॉम्बस्फोटाचा कट रचला. त्याच्याकडून बॉम्ब कसा बनवायचा प्रशिक्षण घेऊन तो बॉम्ब स्कुटरमध्ये ठेवला आणि बॉम्बस्फोट घडवून आणला. तो सध्या तुरूंगात आहे. दुसरा सलीम पटेल हा दाऊश इब्राहिमची बहिण हसीना पारकर यांनी रिअर इस्टेटचा धंदा चालवला. हा पैसा कमवून मंबईच्या बॉम्बस्फोटासाठी वापरला. याची जमीन नवाब मलिक यांनी कमी किंमतीत विकत घेतली, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
दरम्यान, देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, नवाब मलिकांचा राजीनामा हा आमचा विजय नाही, तर तो भारताच्या महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेचा विजय असेल. असंही त्यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक हटाओ देश बचाओ अशा घोषणा देत आझाद मैदानावर भाजपने नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित होते.
Read also:
- नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा मोर्चो ! फडणवींसासह अनेक भाजप नेते आझाद मैदानावर
- गिरीश महाजन यांना उच्च न्यायालयाने फटकारलं ! 10 लाख रूपये देखील जप्त करण्याचे दिले आदेश
- व्हिडीओ क्लिपमध्ये ते मोठे साहेब कोण? शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण
- फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…
- गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे