मुंबई : विधानसभा अध्यक्षांचा मुद्या गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे. यासंदर्भात भाजपनेते गिरीश महाजन यांनी विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुक प्रक्रियासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यावरून उच्च न्यायालयाने गिरीश महाजन यांना चांगलचं फटकारलं आहे. त्याचसोबत त्यांनी जमा केलेले 10 लाख जप्त करण्याचे देखील आदेश दिले आहेत.
नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
महाराष्ट्रात सध्या राज्यपाल आणि मुख्यमंत्री हे दोन्ही घटनात्मक पदे एकमेकांसोबत नाहीत. त्यांच्या वादामध्ये नुकसान कुणाचं होत आहे. असं गिरीश महाजन यांना न्यायालयाने विचारणा करत फटकारलं आहे. त्यावेळी न्यायालयाने विधान परिषदेच्या नामनिर्देशित 12 सदस्यांच्या निवडीबाबतचा उल्लेख केला. जर राज्यपालांनी 12 नामनिर्देशित सदस्यांची अद्याप निवड केलेली नाही, मग हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे नाही का ? असा सवाल देखील न्यायालयाने गिरीश महाजन यांना केला आहे.
नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला राष्ट्रवादी करणार जोरदार विरोध; विराट मूक मोर्चाचे आयोजन
विरोधी पक्षांकडून मागील काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरून सत्ताधारी पक्षांवर टीका केली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं आहे. यावरून गिरीश महाजन यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नियमबदलाने लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. असं महाजन यांनी म्हटलं होतं.
मनोज कटके हल्ला प्रकरण; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा, म्हणाले…
राज्याचे हिवाळी अधिवेश देखील अध्यक्षाविना पार पडलं होतं. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशाचं संपुर्ण कामकाज झालं. त्यामुळे हा मुद्दा राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचं एकमत झाल्याने आगामी काही दिवसांत अध्यक्षांचा मुद्दा वर्णी लागण्याची शक्यता आहे.
Read also:
- व्हिडीओ क्लिपमध्ये ते मोठे साहेब कोण? शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण
- फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…
- गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे
- महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला
- आर्यन खान प्रकरणात शिवसेना, काँग्रेस मंत्र्यांचा समावेश; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा