मुंबई : गोव्यात फोन टँपिंग होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळचं वळण लागण्याची शक्यता आहे. आता याच पार्श्वभूमीवर गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी संजय राऊत यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
मनोहर आजगावकर संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले की, राजकारणात असे आरोप- प्रत्यारोप होत राहतात. निवडणुका म्हटल्यावर तर साहजिकच आहे. ज्यांच्यांच खोट नाही, त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. भाजपने गोव्यात कुणाचेही फोन टॅप केले. नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला राष्ट्रवादी करणार जोरदार विरोध; विराट मूक मोर्चाचे आयोजन
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, यावेळी गोव्यात भाजप 22 प्लस उमेदवार विजयी होऊन सत्ता स्थापन करेल. राज्यात सत्ता स्थापनेसाठी आम्हाला सुदीन ढवळीकरांच्या मदतीची गरज भासणार नाही. सध्या फोन टँपिंगचा कार्यक्रम उत्तम सुरू आहे. गोव्यात शांतता फोन टँपिंग सुरू आहे. हा महाराष्ट्रा पँटर्न आहे, महाराष्ट्र पँटर्नचे जे प्रमुख होते तेच निवडणूक काळात गोव्याचे प्रमुख होते असा टोला ही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला. काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा आधारही आम्ही दिंगबर कामत यांना दिल्याचं संजय राऊत म्हणाले होते.
Read also:
- गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे
- महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला
- आर्यन खान प्रकरणात शिवसेना, काँग्रेस मंत्र्यांचा समावेश; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी अजितदादांचं राज्यपालांना साकडं; कोश्यारी निर्णय घेणार?
- मनोज कटके हल्ला प्रकरण; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा, म्हणाले…