मुंबई : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी परवानगी देण्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोषारी यांची भेट घेतली. विधानसभा अध्यक्ष निवडी संदर्भातील निवेदन काल राज्यपालांना सादर करण्यात आले. अर्थसंकल्पीय काळात विधानसभा अध्यक्षपद हे रिक्त ठेवणे योग्य नाही. यासाठी एक तारीख द्यावी व राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रलंबित प्रश्नही सोडवावा अशी मागणी महाविकास आघाडी तर्फे राज्यपालांना करण्यात आली आहे.
एसटीचं विलिनीकरण नाहीचं; वेतनात मात्र घसघशीत वाढ होणार
यावेळी १२ आमदारांनी केलेल्या गैर वर्तनाबद्दल जेव्हा त्यांचे निलंबन करण्यात आले तेव्हा न्यायालयाने तुम्ही १ वर्षांसाठी असं निलंबन करू शकत नाही असा निर्णय दिला होता. याच निर्णयाचा आरसा दाखवून जो १२ आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे त्याला लवकरात लवकर सोडवण्याची मागणी अजित पवार यांनी राज्यपालांना केली आहे.
10 मार्चपर्यंत कामावर या, अन्यथा…; परिवहनमंत्री परबांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा
लोकशाही पध्दतीने ठराव करून व नियमावलीच्या अधीन राहून १२ नावे देण्यात आलेली आहेत. या दोन गोष्टींवर राज्यपालांनी आम्हाला वेळ दिला, असे पवारांनी सांगितले आहे. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आता अर्थसंकल्पीय अधिवेशन हे पाच दिवसांचे न ठेवता त्याचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. या कालावधीत विधानसभा अध्यक्षपद रिक्त ठेवणे हे अशोभनियीय आणि नियमांच्या चौकटीत न बसणारे ठरेल असं म्हटलं आहे.
Read also:
- मनोज कटके हल्ला प्रकरण; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा, म्हणाले…
- नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला राष्ट्रवादी करणार जोरदार विरोध; विराट मूक मोर्चाचे आयोजन
- नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
- विधानसभा अध्यक्षीय निवडणूक 9 मार्चला प्रस्तापित; त्या 12 आमदारांचा देखील प्रश्न सुटणार
- ओबीसी आरक्षणावर अजित पवारांनी सांगितला फॉर्मुला; सोमवारी बिल देखील मांडणार