मुंबई : पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष भास्करराव जाधव यांच्या दालनात जाऊन धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांचं निलंबन अजूनही मागे घेण्यात आले नाही. यावरून विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांवर जोरदार टिकास्त्र सोडत आहेत. अशातच आता या 12 आमदारांच्या बाबतीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
आमचे राजकीय मतभेद असतील परंतु…; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सल्ला
तसेच विधान सभेतील रिक्त असलेल्या 12 आमदारांचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. यासंदर्भात राज्यपालांशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. जे 12 आमदार आहेत, त्यांचं लोकशाहीत बहुमताच्या सरकारच्या निर्णयांचं महत्त्व असतं. तसेच विधानपरिषदेच्या 12 आमदारांना संधी द्यावी. तसेच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत परवानगी देतील. असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
तुमच्या सारखा समजुतदार नेता…; भुजबळांनी विधानसभेत फडणवीसांचं केलं कौतुक
राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे की, राज्यपाल देतील त्या तारखेला निवडणूक घेऊ आम्ही यासंदर्भात निवडणुका घेणार आहोत. तसेच विधानसभा अध्यक्ष निवडणूक ही 9 मार्चला प्रस्तावित असल्याचे सांगितले. त्याचबरोबर 12 आमदारांची फाईल मार्गी लावा आणि विधानसभा अध्यक्षांची निवड मार्गी लावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. बऱ्याच काळापासून विधानसभेचं अध्यक्षीय पद रिक्त आहे. सध्या उपअध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सुरू आहे.
Read also:
- ओबीसी आरक्षणावर अजित पवारांनी सांगितला फॉर्मुला; सोमवारी बिल देखील मांडणार
- 10 मार्चपर्यंत कामावर या, अन्यथा…; परिवहनमंत्री परबांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा
- एसटीचं विलिनीकरण नाहीचं; वेतनात मात्र घसघशीत वाढ होणार
- आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही; अजित पवारांचं प्रवीण दरेकरांना प्रत्युत्तर
- ओबीसी आरक्षणाला राज्य सरकारचा धक्का नाही धोका; पंकजा मुंडे राज्य सरकारवर कडाडल्या