मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणासाठी आम्ही सरकारच्या बाजूने असल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत आगामी काळातील निवडणुका संदर्भात भिती देखील व्यक्त करून दाखवली.
न्यायालयासमोर आणखी किती वेळा तोंडघशी पडणार; ओबीसी आरक्षणावरून सरकारला चंद्रकांत पाटलांचा सवाल
राज्य सरकारने सादर केलेला ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भातील अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यावर विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, आरक्षण नसेल तर आगामी निवडणुकांमध्ये ओबीसींना प्रतिनिधित्व मिळणार नाही. यासंदर्भात या अहवालात एक अवाक्षर देखील नाही आहे.
राज्यपाल भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करताहेत; काँग्रेसची राज्यापालांवर जहरी टीका
ते पुढे म्हणाले की, आपण याबाबतीत भुजबळ यांना विचारा. आमची सहकार्याची भूमिका आहे. परंतु राज्य सरकार गंभीर आहे का? की कुणाच्या दबावाखाली आहे? आपण टोपी घातली पण हे आपल्याला टोपी घालत आहेत, हे लक्षात ठेवा. तुमचे आमचे राजकीय मतभेद असतील, पण आरक्षणाच्या बाबतीत आम्ही तुमच्या सोबत आहोत.
अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार; सीबीआयकडून सलग जबाब नोंद
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आरक्षणासंदर्भात भीती देखील व्यक्त केली. आगामी काळात जर ओबीसी आरक्षणांशिवाय निवडणुका झाल्या तर त्यांना पुढे आरक्षण मिळणार नाही. काल सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण संपवलं आहे. त्यामुळे या सरकारचं आता हसं झालं आहे. असं ते म्हणाले.
Read also:
- मग आता हे सरकार पवार साहेबांचे म्हणणे ऐकत नाही का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
- जेव्हा माय माऊलीची बेअब्रू अन्…; राज ठाकरेंच्या आवाजातल्या चित्रपटाच्या टीझरने घातला धुमाकूळ
- तुमचे जुने व्हिडिओ बाहेर काढले तर…; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना इशारा
- गिरीश महाजनांनी दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केले; नाथाभाऊंचा मोठा गौप्यस्फोट
- पाणी पुरवठा टँकर घोटाळा: अण्णा हजारेंच्या स्वीय सहाय्यकाची कंपनी गोत्यात, अण्णांच्या भूमिकेकडे लक्ष