मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहेत. या अधिवेशनात शेतकऱ्यांचा वीज तोडणी चा देखील मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
न्यायालयासमोर आणखी किती वेळा तोंडघशी पडणार; ओबीसी आरक्षणावरून सरकारला चंद्रकांत पाटलांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात वीजकापणी कधीच केली गेली नाही. मग सध्या या सरकारच्या काळात तिन्ही कंपन्या फायद्यात असूनही मग तोट्यात कशा आल्या? असा सवाल ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारला केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, दुष्काळ परिस्थितीमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचे अधिकार सरकारला नाही. राज्यात सध्या अशी परिस्थिती आहे की सत्ताधारी पक्षाचेच नेते आंदोलने करण्याची परीस्थिती निर्माण करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे वीज कापू नये, वसुली करू नये असं म्हटलं होतं. मग आता हे सरकार पवार साहेबांचे म्हणणे ऐकत नाही का? असं ते म्हणाले.
राज्यपाल भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करताहेत; काँग्रेसची राज्यापालांवर जहरी टीका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील यासंदर्भात ठाकरे सरकारवर टीका केली आहे. अजित पवारांनी मागच्या अधिवेशनात सांगितले होते की, आतापासून वीजकापणी बंद. त्यापुढच्या अधिवेशनात सांगितले की आता मी ठामपणे सांगतोय की वीजकापणी होणार नाही. परंतु सध्या तर वीज कापणी करण्याची स्पर्धा लागली आहे. गेली दोन वर्ष आस्मानी संकट आणि आता सुलतानी संकट शेतकऱ्याला झेलावं लागत आहे. यावर सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत. त्यांना यासंदर्भात माहिती द्यावीच लागणार आहे. आम्ही मागे हटणार नाहीत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Read also:
- जेव्हा माय माऊलीची बेअब्रू अन्…; राज ठाकरेंच्या आवाजातल्या चित्रपटाच्या टीझरने घातला धुमाकूळ
- तुमचे जुने व्हिडिओ बाहेर काढले तर…; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना इशारा
- गिरीश महाजनांनी दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केले; नाथाभाऊंचा मोठा गौप्यस्फोट
- पाणी पुरवठा टँकर घोटाळा: अण्णा हजारेंच्या स्वीय सहाय्यकाची कंपनी गोत्यात, अण्णांच्या भूमिकेकडे लक्ष
- अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार; सीबीआयकडून सलग जबाब नोंद