मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून एसटीचा बेमुदत संप सुरु आहे. सरकारने, न्यायालायने विनंती, आदेश देऊनही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही. एसटीचे न्यायालयात ऍड. गुणरत्न सदावर्ते हे नेतृत्व करत आहेत. त्यांनी विलगीकरण घेऊनच दाखवू अशी आर्त हाक कर्मचाऱ्यांना दिलेली आहे.
तुमचे जुने व्हिडिओ बाहेर काढले तर…; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना इशारा
दुसऱ्या बाजूला आता एसटीची विकगीकरणाची लढाई अंतिम टप्यात आलेली आहे. राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवालावर राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी शिक्कामोर्तब केला आहे. या समितीने स्पष्टपणे एसटीची विलीनीकरणाची मागणी फेटाळून लावली आहे. आज अधिवेशनात हा अहवाल मांडण्यात आलेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची निराशा या अहवालामुळे झालेली दिसत आहे. समितीने थेट विलगीकरणाची मागणी मान्य न केल्याने आता कर्मचाऱ्यांच्या पदरात निराशा पडल्याचे चित्र समोर आले आहे.
जेव्हा माय माऊलीची बेअब्रू अन्…; राज ठाकरेंच्या आवाजातल्या चित्रपटाच्या टीझरने घातला धुमाकूळ
एवढंच नाही तर महामंडळाचे अस्तित्व स्वतंत्र ठेवून केवळ कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्याची मागणीही फेटाळण्यात आलेली आहे. मात्र समितीने वेतनवाढीच्या बाबतीत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. विलगीकरण होत नसले तरी वेतनाबाबत कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. महामंडळाची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता, त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यासाठी किमान पुढील चार वर्षे शासनाने त्यांच्या अर्थसंकल्पाद्वारे महामंडळास आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून द्यावा अशी शिफारस समितीच्या मार्फत केली गेली आहे.
Read also:
- आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही; अजित पवारांचं प्रवीण दरेकरांना प्रत्युत्तर
- ओबीसी आरक्षणाला राज्य सरकारचा धक्का नाही धोका; पंकजा मुंडे राज्य सरकारवर कडाडल्या
- तुमच्या सारखा समजुतदार नेता…; भुजबळांनी विधानसभेत फडणवीसांचं केलं कौतुक
- आमचे राजकीय मतभेद असतील परंतु…; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सल्ला
- मग आता हे सरकार पवार साहेबांचे म्हणणे ऐकत नाही का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल