मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशानत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर गौप्यस्फोट केल्याने एकच खळबळ उडाली. माझ्यासह गिरीश महाजन आणि भाजपच्या नेत्यांना खोट्या गुन्हा अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सर्व आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी फेटाळून लावेल आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपनेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे.
गिरीश महाजन यांना उच्च न्यायालयाने फटकारलं ! 10 लाख रूपये देखील जप्त करण्याचे दिले आदेश
आशिष शेलार यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की. लाव रे तो व्हिडीओ काय असतो ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दाखवून दिले आहे. सरकारच्या भयंकर कटाचे वघनाट्य उघड करून ठाकरे सरकारचे त्यांनी वस्त्रहरण केले आहे. या नाटकातील तात्या सरपंच कोण ? मंजुळाबाई कोण ? गोप्या कोण ? मास्तर कोण ? अजुन बरेच अंक बाकी आहेत. असं म्हटलं आहे.
व्हिडीओ क्लिपमध्ये ते मोठे साहेब कोण? शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, देवेंद्र फडणवीस यांनी भयंकर मोठा कट उघडकीस आणला आहे. त्याचबरोबर त्यांनी दाऊद इब्राहिमसंबंधीत देखील मोठा कट उलगडला आहे. त्यामुळे हे सर्व पाहता त्यांच्या जीवाला बरंवाईट होऊ नये म्हणून त्यांची सुरक्षा व्यवस्था तात्काळ वाढवण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…
राज्यात आगामी काही काळात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार संघर्ष बघायला मिळत आहेत. नवाब मलिक प्रकरण, संजय राऊत, नारायण राणे, किरीट सोमय्या या राजकीय नेत्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांची देखील मालिका सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण कोणत्या दिशेने जाईल, ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- महाविकास आघाडी सरकारवर शरद पवार नागासारखे बसलेत! नितेश राणेंची जहरी टीका
- राज्यभर आम्ही लढा उभारू अन् तुमचं जगणं मुश्किल करून टाकू! चंद्रकांत पाटलांचा इशारा
- अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भाजप माहीर! फडणवीसांच्या राजकीय बॉम्बवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
- नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शातं बसणार नाहीत! फडणवीसांचा हल्लाबोल
- नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा मोर्चो ! फडणवींसासह अनेक भाजप नेते आझाद मैदानावर