मुंबई : देशात 5 विधान सभा निवडणुकीचे कल आज लागणार आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपुर याठिकाणी भाजपने आघाडी घेतली आहे. तर पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्ष सध्या आघाडीवर आहे. अशातच आता महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्रात देखील भाजप येणार असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रियी दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, राजकीय जीवनात अशी स्थिती येत असते. 1977 मध्ये देशातील प्रत्येक राज्यात काँग्रेसचा पराभव झाला होता. राजस्थान, पंजाब, दिल्ली, गुजरात, कर्नाटक राज्यात काँग्रेस हरली होती. त्यावेळी काँग्रेस संपली, असं अनेक लोकांनी सांगितलं होतं.1977 ला काँग्रेसला हरवणाऱ्या लोकांनी 1980 ला सत्ता दिली. पाच राज्यातील लोकांचं मत भाजपच्या बाजूनं आहे, असं हे मान्य करावं लागेल. महाराष्ट्र बाकी है म्हणताय तर महाराष्ट्र तैयार है, असं शरद पवार म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत. तर पंजाबमध्ये काॅंग्रेसचा सुपडासाफ झाल्याचं चित्र दिसत आहेत. गोव्यात देखील भाजपने आघाडी घेतली असून त्यांनी सत्ता स्थापन करणार असल्याचं बोलून दाखवलं आहे. त्यामुळे गोवा, मणिपूर, उत्तरप्रदेश, आणि उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे.
Read also:
- लोकांचा आवाज हा देवांचा आवाज, आपचे अभिनंदन! नवज्योत सिंग सिद्धू यांचे ट्विट
- आमदार महेश लांडगे यांनी गोव्याचे मैदान मारले; जोशुआ डिसोझा यांचा दमदार विजय!
- अकेला देवेंद्र क्या करेगा पुछनेवालों को करारा जवाब! चित्रा वाघ यांनी शिवसेनेला डिवचलं
- गोवा निवडणूक: म्हापशातून भाजपच्या जोशुआ डिसुझा यांची निर्णायक विजयाकडे वाटचाल
- सगळीकडे खिचडी होऊ शकते; परंतु गोव्यात नाही! संजय राऊत यांचं भाकित