मुंबई : देशात सध्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागण्याची शक्यता आहे. पाच राज्यांपैकी भाजप पक्ष सर्वात आघाडीवर असून उत्तर प्रदेश मध्ये सत्ता राखण्यास भाजप यशस्वी होताना दिसत आहे. तर गोव्यात देखील भाजपने आघाडी घेतली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर गोव्याच्या निवडणुकीवरून निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी सरकारवर शरद पवार नागासारखे बसलेत! नितेश राणेंची जहरी टीका
चित्रा वाघ यांनी ट्विट करत शिवसेनेला डिवचण्याचा देखील प्रयत्न केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, सर्वज्ञानींच्या झंझावती प्रचारदौऱ्यांचा परिणाम शिवसेनेच्या गोवा उत्तर प्रदेश सगळ्या उमेदवारांचं डिपॉडीट जप्त होतांना दिसत आहे, असं म्हटलं आहे. तर त्यांनी झुकेगा नही., जब तक महाराष्ट्र में इसी तरह शिवसेना का सुपडा़ साफ़ नहीं करता असा इशारा देखील चित्रा वाघ यांनी दिला आहे.
राज्यभर आम्ही लढा उभारू अन् तुमचं जगणं मुश्किल करून टाकू! चंद्रकांत पाटलांचा इशारा
तसेच त्या पुढे बोलताना म्हणाले, भाजपची सरशी होणारचं होती. भाजपने देशभरात जनतेला विकासासोबतचं विश्वास ही दिला. परंतु इथे मात्र नेहमीप्रमाणे विरोधकांची एव्हीएमच्या नावाने रडायला सुरूवात झाली. तसेच अकेला देवेंद्र क्या करेगा पुछनेवालों को.. फिर एक बार करारा जवाब.. यह तो सिर्फ अंगडाई है.. अब महाराष्ट्र कि बारी है.. जय हो.. विजय हो.. असं त्यांनी ट्विट केलं आहे.
अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भाजप माहीर! फडणवीसांच्या राजकीय बॉम्बवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
पाच राज्यांच्या निवडणुकांपैकी शिवसेनेने गोवा आणि उत्तरप्रदेशमध्ये उमेदवार उभे केले होते. पंरतु अद्यापही त्यांना दोन्हींही राज्यांत खातं उघडता आलं नाही. त्यावरून त्यांच्यावर भाजपच्या नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे.
Read also:
- गोवा निवडणूक: म्हापशातून भाजपच्या जोशुआ डिसुझा यांची निर्णायक विजयाकडे वाटचाल
- सगळीकडे खिचडी होऊ शकते; परंतु गोव्यात नाही! संजय राऊत यांचं भाकित
- आमचं राजकारण नकलांवर उभं नाही; संजय राऊतांचा राज ठाकरे यांना प्रत्युत्तर
- महाविकास आघाडीतील काही उपटसुंभ नेत्यांमुळे कामगारांची फसगत! एसटी संपावर प्रकाश आंबेकरांची प्रतिक्रिया
- नाटकातील सरपंच, मंजुळाबाई, गोप्या, मास्तर कोण? अंक अजून बाकी! शेलारांचा सरकारला इशारा