मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडेल असं वक्तव्य भाजपकडून केलं जात आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी सरकार अजून स्थिर आहे. मात्र काल देशातील पाच विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती लागल्याने एका मुलाखतीत काॅंग्रेस खासदारांनीच सरकार पडणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्र अभी बाकी है म्हणताय महाराष्ट्र तैयार है: शरद पवार यांचे भाजपला प्रतिआव्हान
काॅंग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी काल पाच राज्यांच्या विधानसभा निकालांसाठीच्या चर्चासत्रात भाग घेतला होता. यावेळी भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर देखील उपस्थित होते. या चर्चासत्रात देशातील, महाराष्ट्रातील राजकारणांबद्दल चर्चा करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातील सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असं वक्तव्य कुमार केतकर यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा सुरू आहे.
लोकांचा आवाज हा देवांचा आवाज, आपचे अभिनंदन! नवज्योत सिंग सिद्धू यांचे ट्विट
कुमार केतकर म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून मी हेच सांगतोय. तीन पक्षांचा सरकार आहे. ते वेगवेगळ्या यंत्रणा वापरत नाही. ते प्रमाणिक लोक आहेत. त्यांच्या घरी छापे टाकत नाहीत. यांचं उदाहरण सांगायचं झाल्याचं नारायण राणे यांचं नाव घेता येईल. महाराष्ट्रातील सरकार कोणत्याही क्षणी जाऊ शकेल. याठिकाणी आपण बोलत आहोत परंतु तिकडे सरकारला सुरूंग लावण्याची तयारी सुरू झालेली असेल. असं चर्चासत्रात विचारलेल्या प्रश्नांवर कुमार केतकर यांनी उत्तर दिलं आहे.
अकेला देवेंद्र क्या करेगा पुछनेवालों को करारा जवाब! चित्रा वाघ यांनी शिवसेनेला डिवचलं
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांदेखील होऊ घातल्या आहेत. यातच महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठीमागे लागला आहे. त्यामुळे आगामी काही काळात राज्यात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार याकडे लक्ष लागून आहे.
Read also:
- आता पुढचं टार्गेट महानगरपालिका! विधानसभा निवडणुका निकालानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
- विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसचा सुपडा साप! राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया
- मोदी-योगींच्या ‘व्हीजन ऑफ डेव्हलपमेंट’ला देशवासीयांची साथ : आमदार महेश लांडगे
- उन्हें पराजित कौन करेगा, जिसके रक्षक राम हैं! उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी
- गोव्यातील विजयाबद्दल फडणवीसांनी सांगितली दोन नावं! गोव्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा