मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला मलम लावण्यासाठी अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी एसटी महामंडळाला 1 हजार नवीन बसेस देणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच यावेळी त्यांनी पंचसुत्री कार्यक्रमावर भर देऊन महाराष्ट्र हे एक ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारं पहिलं राज्य असल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील सरकार लवकरच पडणार! काॅंग्रेस खासदार कुमार केतकर यांचं वक्तव्य
यंदाच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी शिर्डी विमानतळासाठी 1500 कोटी उपलब्ध करून दिले आहेत. त्याचसोबत गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारण्याची घोषणा केली आहे. पंडिता रमाबाई यांच्या नावाने देखील राज्यात विविध योजना राबविण्यात येणार आहेत. तसेच आयात कराव्या लागणाऱ्या वस्तूंची राज्यात निर्मिती करण्यात येणार असुन नाशिच्या दिंडोरी तालुक्यात आदिवासी समाजासाठी आदिवासी उद्योग क्लस्टर उभारणार आहेत. त्याचसोबत 500 मेगावॅट च्या सौरनिर्मितीचे प्रकल्प तयार करण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा यावर्षी कालवधी वाढवून तो डिसेंबरपर्यंत करण्यात आला आहे.
आता पुढचं टार्गेट महानगरपालिका! विधानसभा निवडणुका निकालानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
राज्याच्या पर्यटन विभागाला देखील भरभरून निधी देण्यात आला आहे. यात रायगड किल्ला आणि परिसर विकासासाठी 100 कोटी देण्यात आले आहेत. जलजीवन मिशन योजनेसाठी 1 हजार 600 कोटी तर मुख्यमंत्री ग्रामीण पेय जल मिशनसाठी पाणीपुरवठा विभागाला 3 हजार कोटी देण्यात आले आहेत. तसेच मुंबई, पुणे आणि नागपुर याठिकाणी हेरिटेज वॉक तयार करण्यात येणार आहे. तर पालघर जिल्हाला ब वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अजिंठा वेरूळ साठी सर्वागीण विकास आराखड्याचे देखील विचार करण्यात आला आहे.
मोदी-योगींच्या ‘व्हीजन ऑफ डेव्हलपमेंट’ला देशवासीयांची साथ : आमदार महेश लांडगे
राजगड, तोरणा, शिवनेरी, सजनगड आणि विजय दर्गसाठी 14 कोटी, शिवडी आणि सेंटजॉर्जच्या विकासासाठी 7 कोटी किल्ले आणि युद्धपद्धतीसाठी युनेस्कोकडे मागणी देखील करण्यात येणार आहे. तसेच गेट वे ऑफ इंडियावर महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारी फिल्म, औरंगाबाद येथे वंदे मातरम् सभागृह उभारण्यासाठी 43 कोटीची तरतुद तर सांस्कृतिक विभागासाठी 195 कोटी निधी देण्यात आला आहे.
Read also:
- महिला, शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येणार! वाचा यंदाचा अर्थसंकल्प
- देवेंद्र फडणवीस असे 10-20 पवार खिशात घालून फिरतात! गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
- लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची अवस्था काॅंग्रेससारखी होईल, त्यांनी भाजपसोबत यावे रामदास आठवले
- भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही! अमोल मिटकरींची भाजपवर खरमरीत टीका
- महाराष्ट्रातील सत्तांतर अटळ, महाराष्ट्रात पर्यायी सरकार देऊ : देवेंद्र फडणवीस