नवी दिल्ली : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता उत्तर प्रदेशमध्ये पोहचली आहे. उत्तर प्रदेशमधील लोणी याठिकाणी काॅंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची सभा झाली. या सभेत प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी याचं कौतुक करत भाजपवर निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्राच्या इतिहासात पळवापळवीला थारा देणारे एवढे कमजोर नेते कधीचं झाले नसतील”
मला माझा मोठा भाऊ राहुल गांधी यांचा अभिमान आहे. कारण त्याला बदनाम करण्यासाठी, त्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी सरकारने एक हजार कोटी रूपये खर्च केले. पंरतु तो कुणालाच घाबरला नाही. अदानी आणि अंबानी यांनी देशातील सर्व विकत घेतले. मीडिया विकत घेतली. पण ते माझ्या विकत घेऊ शकत नाही. असंही प्रियंका गांधी यांनी म्हटलं.
“आता शाहू, फुले, आंबेडकर ऐवजी जहांगीर, औरंगजेब, बाबर… म्हणणार बहुतेक NCP वाले”
राहुल गांधी सत्याचे कवच परिधान करून चालत आहे. कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधी यांनी जॅकेट घालावा असं म्हला लोकांनी सांगितलं तसेच लोक मला विचारत आहे की, राहुल गांधी फक्त टी-शर्ट का घालतात,? कुणीतरी त्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी किमान जॅकेट तरी घालालया लावलं . काल कोणीतरी विचारले की तुम्हाला त्यांच्या सुरक्षेची भीती वाटत नाही. ते काश्मिरमध्ये जातील. पंजाबमध्ये जातील. असंही त्या म्हणाल्या.
Read also
- जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचा खळबळजनक दावा, बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिलेचा शोध, फडणवीसांना टॅग
- “कधीच कुणावर वैयक्तीक कंबरेखाली वार करत केला नाही, जर मला..” जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
- मुंबई फिल्मसिटी युपीला जाणार असल्याच्या आरोपावर योगीचं उत्तर, म्हणाले, मुंबई ही..
- “‘टिल्लू’ च्या वर्मावर घाव बसलाय”; राष्ट्रवादीचा नितेश राणेंना खोचक टोला
- शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय अडचण? छगन भुजबळांचा सवाल