मुंबई : शरद पवारांच्या भेटीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी, मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने केळी बागांसह, घरांचं मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली.
दुसरीकडे, राज्यात गेल्या ६ महिन्यांपासून सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीमुळे लवकरच सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारची नाव गंटागळ्या खात बुडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर, देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भेटींमुळे राज्यात राजकीय चर्चांना तुफानी लाटांसारखे उधाण आले.
या पार्श्वभूमीवर, आज रक्षा खडसे फडणवीसांच्या “त्या” भेटीवर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजकारणात कोणीही कुणाचा वैयक्तिक शत्रू नसतो. इथे केवळ वैचारिक विरोध केला जातो. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार गिरीश महाजन यांच्या मनात एकनाथ खडसे यांच्याबद्दल कुठलीच कटुता नाही. तसेच, फडणवीसांच्या भेटीला कोटही राजकीय रंग देऊ नये आणि कोणताही राजकीय अर्थ काढू नये,’ असं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.
‘राजकारणात विचारांमध्ये मत भिन्नता असते. वैचारिक द्वेष असतो. त्यामुळे एकमेकांच्या विचारधारेला विरोध केला जातो. मात्र, राजकारणात कुणीही कुणाचा वैयक्तिक शत्रू नसतो. नाथाभाऊंचे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. त्यांनही कधी कोणाहीबद्दल स्वतःच्या मनात द्वेष ठेवला नाही. त्या काळापुरती राजकीय प्रतिक्रिया द्यायची असते, ती तेव्हा लगेच दिली जाते. पण, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या मनात देखील नाथाभाऊंबद्दल कसल्याही प्रकारची कटुता नाही, असं स्पष्टीकरण रक्षा खडसे यांनी दिलं आहे.
Read Also :
- आरक्षणाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय
- “गोलमाल हैं भाई, कुछ गोलमाल हैं”, आता एकनाथ खडसेही शरद पवारांच्या भेटीला
- ‘पक्षाला उतरती कळा लागू नये म्हणून भाजप, सत्तेत येण्याची तारीख पे तारीख देत आहे’
- तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं, उपचार करायचे असतात
- ‘….तर ते पवारांना ओळखत नाहीत’, फडणवीस-पवार भेटीचा शिवसेनेकडून उलगाडा