मुंबई : राज्याच्या विधानसभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात परत सत्तांतराच्या चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, पवारांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी, आधी भाजपत असणारे आणि आता राष्ट्रवादीमध्ये असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे घर गाठले, यामुळे राज्यात आता लवकरच मोठा राजकीय भूकंप भाजप घडवून आणणार असे वातावरण तयार झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली असून, ‘बाहेरच्या पक्षातून भाजपत आलेले आमदार परत घरवापसी करू नये, भाजपला उतरती कळा लागू नये, म्हणूनच भाजपकडून सत्तेत येण्याची “तारीख पे तारीख” देण्यात येत आहे,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
‘भाजप नेत्यांची एकही भविष्यवाणी खरी होत नसल्यानं, ते हताश आणि निराश झाले आहेत. त्यामुळेच भाजप आघाडी सरकार विरोधात एककलमी कार्यक्रम राबवत आहे, पण महाविकास आघाडीतले तीनही घटक पक्ष एकजुटीने काम करत असून, महामारी, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस या अडचणींवर मात करून, आम्ही जनतेला मदत करण्याची घेतली आहे. आमच्या भूमिकेने जनता संतुष्ट आहे, पण सत्तेत येणार असं सांगून भाजप जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे.
Read Also :
- कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये – सुप्रिया सुळे
- तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं, उपचार करायचे असतात
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत, परिवहनमंत्र्यांची घोषणा
- ‘लोक मोदींकडे पाहून भाजपला मतदान करतात, शिवसेनेलाही बाळासाहेबांमुळेच सत्ता मिळाली’
- ‘….तर ते पवारांना ओळखत नाहीत’, फडणवीस-पवार भेटीचा शिवसेनेकडून उलगाडा