मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी मोदींच्या निवासस्थानी पोहचले आहेत. मराठा आरक्षणावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीतून मराठा आरक्षणावर तोडगा नक्कीच निघेल, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत. आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावर गंभीरपणे विचार करत आहेत. मराठा आरक्षणावर काळजीपूर्वक काम करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मोदींना भेटत आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आहेत. या भेटीतून मराठा आरक्षणावर तोडगा निघेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची काल भेट झाली. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा झाली. मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक काळ ताणला जाऊ नये असं महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याला वाटतं आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार-ठाकरे यांची भेट झाली, असं त्यांनी सांगितलं. ओबीसी आणि मराठा नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राचं वातावरण गढूळ होईल, तणाव निर्माण होईल, अशी परिस्थिती आहे. कोर्टाच्या आदेशानंतर मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या अख्त्यारीत गेला आहे. त्यामुळे केंद्राच्या दरबारात हा विषय मांडणं हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे, असंही ते म्हणाले.
Read Also :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठकीला सुरुवात
- मुंबईच्या मधोमध जंगल फुलणार, ‘आरे’ची 286 हेक्टर जागा वनविभागाकडे सुपूर्द
- ‘… म्हणून पंतप्रधान मोदींनी मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली’
- ‘पवारांच्या ड्रावरमधून पत्र चोरताना टॉर्च मारण्यासाठी अजितदादांबरोबर भाजपची कोण-कोण लोकं होती?’
- ‘महाराष्ट्रात आपलं सरकार आहे, काय दिवे लावले या कर्मदरिद्री सरकारने?’