मुंबई : पंतप्रधानांनी देशाला संबोधित करत संपूर्ण लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याचे सांगितले. पंतप्रधानांचे भाषण ऐकून ‘देर आये दुरुस्त आये’ असं म्हणावं लागेल, असा टोला लगावतानाच केंद्राने जबाबदारी स्वीकारल्यावर आतातरी राज्यांना मागणीनुसार लसपुरवठा होईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण मोफत केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच, केंद्र सरकारच राज्यांना लस पुरवठा करेल, असे ते म्हणाले. यावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदींवर निशाणा साधला.
मा. पंतप्रधानांनी आज देशाला संबोधित करत संपूर्ण लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याचे सांगितले. पंतप्रधानांचे भाषण ऐकून 'देर आये दुरुस्त आये' असं म्हणावं लागेल. केंद्राने जबाबदारी स्वीकारल्यावर आतातरी राज्यांना मागणीनुसार लसपुरवठा होईल अशी अपेक्षा आहे – @nawabmalikncp pic.twitter.com/bcA225w6X4
— NCP (@NCPspeaks) June 7, 2021
18 ते 44 वयोगटातील लसीकरणाची जबाबदारी केंद्राने राज्यांवर ढकलली होती. मात्र आज केंद्र सर्व जबाबदारी घेत असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले. लसीकरणाबाबत केंद्र सरकार वारंवार भूमिका व निर्णय बदलत असल्याचे आम्ही निदर्शनास आणून देत होतो, असे मलिक म्हणाले.
आता उशिरा का होईना जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली. केंद्र सरकारच्या निर्णयांवर सुप्रीम कोर्टाने बोट ठेवल्याने सरकारचे अपयश व प्रतिमा सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जबाबदारी घेण्याची घोषणा केली असावी, असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.
Read Also :
- ‘पवारांच्या ड्रावरमधून पत्र चोरताना टॉर्च मारण्यासाठी अजितदादांबरोबर भाजपची कोण-कोण लोकं होती?’
- ‘महाराष्ट्रात आपलं सरकार आहे, काय दिवे लावले या कर्मदरिद्री सरकारने?’
- पंतप्रधानांची मोफत लसीकरणाची घोषणा; राहुल गांधींनी विचारला ‘हा’ साधा प्रश्न
- ‘त्या’ निर्णयासाठी देवेंद्र फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
- ‘शेवटी कोरोना लस फुकट देण्याची जबाबदारी बापानेच घेतली’