मुंबई : मुंबईच्या मधोमध जंगल फुलवण्याचा मार्ग मोकळा झाला असून, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची जागा वनासाठी राखीव ठेवून येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. २८६.७३२ हेक्टर अधिसूचित जागेचा ताबा आरे दुग्ध वसाहतीने वन विभागास प्रत्यक्ष सोपविला.
मुख्य कार्यकारी अधिकारी, आरे यांच्याकडून मुख्य वनसंरक्षक यांना हा ताबा मिळाल्याने मुंबई सारख्या महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल फुलविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बोरिवली तहसीलदार आणि नगर भूमापन अधिकारी मालाड यांच्या उपस्थितीत ताबा घेण्यात आला. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला होता.
आरे येथील १२५.४२२ हेक्टर, गोरेगाव येथील ७१.६३१ हेक्टर आणि मरोळ मरोशी येथील ८९.६७९ हेक्टर इतकी जागा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. याव्यतिरिक्त मरोळ मरोशी गावातील ४०.४६९ हेक्टर जागा यापूर्वीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात देण्यात आली आहे. त्यामुळे आता ८१२ एकर जागेवर जंगल वसवता येणार आहे.
मुंबई सारख्या महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल फुलविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
Read Also :
- ‘… म्हणून पंतप्रधान मोदींनी मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली’
- ‘पवारांच्या ड्रावरमधून पत्र चोरताना टॉर्च मारण्यासाठी अजितदादांबरोबर भाजपची कोण-कोण लोकं होती?’
- ‘महाराष्ट्रात आपलं सरकार आहे, काय दिवे लावले या कर्मदरिद्री सरकारने?’
- पंतप्रधानांची मोफत लसीकरणाची घोषणा; राहुल गांधींनी विचारला ‘हा’ साधा प्रश्न
- ‘त्या’ निर्णयासाठी देवेंद्र फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार